Thackeray group leaders appeal to Eknath Shinde to apologize : ठाकरे गटाच्या नेत्या एकनाथ शिंदेंवर बरसल्या
Buldhana राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्यानिमित्त बुलढाणा जिल्हा भेटीवर असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके यांनी त्यांच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली आहे. “शेतकरी, तरुण, सामान्य जनतेचे हाल सुरु असताना आभार कसले मानता? माफी मागा!” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील कैलास नागरे या युवा शेतकऱ्याने सिंचनाच्या अभावामुळे आत्महत्या केली, ही घटना अजूनही ताजी असताना सरकारने कुठलाही ठोस प्रतिसाद दिलेला नाही, अशी टीका शेळके यांनी केली. “शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, पीकविमा मिळालेला नाही. तरुण पिढी बेरोजगारीमुळे स्थलांतर करत आहे, आरोग्य व शिक्षण व्यवस्था ढासळली आहे, हे वास्तव असूनही सरकार केवळ दौरे करत आहे,” असे त्या म्हणाल्या.
Adv. Jayashri Shelke : वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांपासून लोकांना वाचवा
2024 च्या निवडणुकीत अल्प मताधिक्याने निवडून आलेले शिंदे गटाचे लोकप्रतिनिधी जनतेच्या समस्या सोडवण्याऐवजी शिवीगाळ व दादागिरी करताना दिसतात, असा आरोपही अॅड. शेळके यांनी केला. “जनतेच्या मनात येईल तर ती माफ करेल, पण स्वतःहून आभार मानणे म्हणजे जनतेचा अपमान आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांनी आभार नव्हे तर माफी मागावी,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.
NCP Sharad Pawar : हिंगण्यातून शरद पवारांची राष्ट्रवादी रिकामी !
रविवारी आभार दौरा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा २७ एप्रिल रोजी बुलडाणा शहरात होणार आहे. या दौऱ्याच्या नियोजनासाठी आमदार संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच नियोजन बैठक पार पडली. या दौऱ्यातून शिवसेना पक्षाचे एकत्रीकरण व जनतेप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करणार आहे. हा दौरा केवळ औपचारिक नव्हे तर एक भव्य शक्तीप्रदर्शन ठरणार आहे, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.