Breaking

Caste-wise censuses : देशातील जनतेसाठी आज सोन्याचा दिवस !

 

Chandrashekhar Bawankule said today is a golden day for the people of the India : काँग्रेसने जातिनिहाय जनगणनेचा विचार कधीच केला नाही

Nagpur : केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज (३० एप्रिल) जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दशकांपासून देशातील जनतेची ही मागणी होती. काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कधीच हा निर्णय घेतला नाही. मात्र भाजप सरकारच्या काळात त्यासाठी ओरड केली. पण मोदी सरकारने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय घेऊन देशभरातील जनतेला आनंदाची भेट दिली आहे. खऱ्या अर्थाने देशातील जनतेसाठी आज सोन्याचा दिवस आहे, असे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहिर केल्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आतापर्यंत एससी, एसटी आणि इतर अशी जनगणना केली जात होती. मात्र आता एससी, एसटी आणि इतर जातिनिहाय अशी गणना केली जाणार आहे. अनेक वर्षांपासूनची देशवासीयांची मागणी आज पूर्ण झाली आहे. ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या वेळीही ही मागणी रेटून धरली गेली होती. आज केंद्र सरकारने जनतेची मनोकामना पूर्ण केली. ज्या समाजापर्यंत अजूनही सरकारच्या योजना पोहोचल्या नाहीत, त्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय भूसंपादन नाहीच!

शेतकऱ्यांचे पैसे स्वतःच्या नावावर वळवल्याप्रकरणी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबद्दल विचारले असता, या प्रकरणाचा तपास होईल, चार्जशीट दाखल होईल. त्यानंतर विखे पाटील या प्रकरणात दोषी आहेत की नाही, हे स्पष्ट होईल, सध्या गुन्हा दाखल झाला आहे. पण चार्जशीट दाखल होतपर्यंत यामध्ये काही बोलता येणार नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : शासनावरील विश्वास वाढवण्याचा प्रयत्न

अक्षय तृतीयेच्या दिवशी मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर जाणार होते, ते आता तेथे गेले आहेत. सागर बंगल्यावरूनही त्यांनी भरपूर काम केले. आता ‘वर्षा’वरून ते महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण करतील, असे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.