Breaking

Caste-wise censuses : जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी मोदी सरकारचा पुन्हा एक डाव !

NCP alleges another ploy by Modi government to divert attention : पूर्वी विरोध करणाऱ्या भाजपने अचानक यु टर्न का घेतला?

Nagpur : गेल्या कित्येक वर्षांपासून जातिनिहाय जनगणना करण्याची मागणी जोर धरत होती. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर संघटनांनी या मागणीसाठी आंदोलने केली होती. अखेर केंद्र सरकारने काल (३० एप्रिल) जातिनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. तेव्हापासून यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या निर्णयावर कडवी टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, जातिनिहाय जनगणना समाज तोडण्यासाठी आहे, अशी भूमिका घेऊन आजवर विरोध करणारा भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी अचानक यु टर्न का घेतला, असा सवाल त्यांनी केला. जातिय जनगणना करण्याची केंद्र सरकारची घोषणा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून देशातील जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी टाकलेला डाव आहे, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

Caste-wise censuses : आता स्थिरता निर्माण होईल, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास !

चुनावी जुमला ठरू नये..
दुसरीकडे केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय म्हणजे इंडिया आघाडीचा विजय आहे. आम्ही यासाठी केलेला संघर्ष यशस्वी झाला, याचा आनंद आहे. शेवटी ‘देर आये दुरूस्त आये..’, असंच केंद्र सरकारच्या या निर्णयाबद्दल म्हणावं लागेल. फक्त केंद्र सरकारची ही घोषणा म्हणजे चुनावी जुमला ठरू नये, अशी भीतीही कुंटे पाटील यांनी व्यक्त केली. चुनावी जुमला ठरू नये, यासाठी आम्ही यापुढे संघर्ष करत राहू, असेही ते म्हणाले.