Congress state president Harshvardhan Sapkal said Fadnavis’ crop insurance pattern is incomprehensible : संपूर्ण योजनाच बदलल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार
Chhatrapati Sambhaji Nagar : गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेली विमा योजना बंद करण्याची काहीही गरज नव्हती. योजनेत नव्या तंत्रज्ञनानाचा वापर करता आला असता, काही बदल करता आले असते. पण पूर्ण योजनाच बदलवल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेसाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. आतापर्यंत सुरू असलेली योजना पुन्हा लागू करावी, अन्यथा काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
छत्रपती संभाजी नगर येथे हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. ते म्हणाले, एक रुपयात पीक विमा योजना सुरू ठेवण्यात कुठलीही अडचण नव्हती. योजनेला बदनाम करणाऱ्या घोटाळ्यांची चौकशी सरकारने करायला पाहिजे होती. पण अख्खी योजनाच बदलण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना जी तुटपुंजी नुकसान भरपाई मिळत होती, तीसुद्धा आता बंद झाली आहे.
Harshawardhan Sapkal : मासेमारीत शिरले ठेकेदार अन् भांडवलदार !
निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणा केवळ आणि केवळ मतांसाठी केल्या होत्या, हे आता सिद्ध झाले आहे. प्रतिकूल परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यांमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना मिळत होती, ती पद्धतच नव्या योजनेमध्ये नसणार आहे. फक्त पीक कापणीच्या आधारावर नुकसान भरपाई देण्याची पद्धत सरकार अवलंबत आहे. त्यामुळे सुरू असलेल्या खरीप हंगामाची नुकसान भरपाई पुढील हंगामात मिळणार आहे. हा शेतकऱ्यांवरील अन्याय असल्याचे सपकाळ म्हणाले.
Harshawardhan Sapkal : सरकारने जैन बांधवांच्या भावना पायदळी तुडवल्या!
विखे पाटलांचा राजीनामा केव्हा ?
स्वतःच्या कारखान्यातील पैशांची गरज राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढून भागवली. शेतकऱ्यांचा पैसा परस्पर स्वतःकडे वळवला. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सरकार विखे पाटील यांचा राजीनामा केव्हा घेणार, असा प्रश्न हर्षवर्षन सपकाळ यांनी विचारला आहे.