Breaking

Akola Municipal Corporation : कंपनीने काम अर्धवट सोडले; ७ कोटींचा SCADA प्रकल्प ठप्प!

Company abandons work halfway; SCADA project worth Rs 7 crore stalled : सिस्टीम कार्यान्वित करा अन्यथा आंदोलन अटळ, मनपाला चेतावणी

Akola शहरातील नागरिकांच्या कराच्या पैशातून सुमारे ७ कोटी रुपये खर्च करून उभारलेली SCADA (Supervisory Control and Data Acquisition) प्रणाली गेल्या तीन वर्षांपासून अकार्यक्षम आहे. अद्यापही ही प्रणाली कार्यान्वित झालेली नाही. अमृत योजनेअंतर्गत नागपूर येथील एका खासगी कंपनीकडून ही प्रणाली विकसित करण्यात आली होती. मात्र कंपनीने काम अर्धवट टाकल्यामुळे हा प्रकल्प ठप्प झाला आहे. या गंभीर अनियमिततेवर अकोल्यात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अँड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख व वंचित बहुजन आघाडीचे Vanchit Bahujan Aghadi शहर संघटक निलेश देव यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, “मनपा प्रशासनाने नागरिकांच्या विश्वासाला तडा दिला आहे. एवढा मोठा खर्च करून जर ही प्रणाली फक्त शोभेची वस्तू बनून राहिली असेल, तर त्या पैशाची जबाबदारी कोण घेणार? आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून ही प्रणाली कार्यान्वित करावी. अन्यथा, आम्ही शहरव्यापी तीव्र आंदोलन छेडू.”

Women and Child Development : फडणवीसानी उलटा क्रम लावला की काय ?

पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे व कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही प्रणाली तीन वर्षांपासून निष्क्रिय आहे. परिणामी ना पाणीपुरवठा सुरळीत झाला, ना तांत्रिक बिघाड कमी झाले. उन्हाळ्यातील पाणीटंचाईच्या काळात ही प्रणाली उपयोगी ठरू शकली असती. सध्या मात्र ती केवळ एक ‘डेमो प्रोजेक्ट’ ठरली आहे.

“शहरातील सामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय हा भ्रष्टाचाराइतकाच गंभीर गुन्हा आहे. आम्ही या प्रणालीचा सखोल अभ्यास केला आहे. ती कार्यान्वित झाल्यास अकोल्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थापनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. मात्र, आज ती केवळ बघ्यापुरतीच राहिली आहे. आयुक्तांनी याची तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, आम्ही मनपा कार्यालयासमोर धरणे, मोर्चा आणि जनआंदोलन छेडू,” असे निलेश देव यांनी स्पष्ट केले.

Shivsens uddhav Balasaheb Thackrey : शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा

अनेक नागरिकांनी मनपावर नाराजी व्यक्त केली आहे. “कर भरा आणि बदल्यात फसवा” हेच धोरण मनपा राबवत असल्याची भावना जनतेत बळावली आहे. “SCADA प्रणाली कार्यान्वित असती, तर निदान बिघाड व गळती कमी झाली असती,” असे मत अनेकांनी मांडले.