Breaking

Bacchu Kadu : राज्यात तीन माकडांचे सरकार; आता रस्त्यावर उतरण्याची वेळ

The government has no money for farmers : बच्चू कडू यांचा सरकारवर घणाघात; संताजी-धनाजी पुरस्कार सोहळा

Amravati “विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक सभेत ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही’ असे आश्वासन दिले होते. मात्र, आता सरकारकडे शेतकऱ्यांसाठी चार पैसेही नाहीत. सरकारमध्ये एकाच्या तोंडावर बोट आहे, दुसऱ्याच्या डोळ्यावर तर तिसऱ्याच्या कानावर हात आहे. हे तीन माकडांचे सरकार आहे,” अशा शब्दांत माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली.

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मंगळवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित संताजी धनाजी पुरस्कार सोहळा आणि विभागीय मेळाव्यात ते बोलत होते. कृषी अर्थसंकल्पाच्या तुलनेत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निधीवर टीका करताना कडू म्हणाले, “तामिळनाडूचा अर्थसंकल्प ३ लाख कोटींचा असून कृषी क्षेत्रासाठी ४४ हजार कोटींची तरतूद आहे. उत्तर प्रदेशमध्ये ८.५ लाख कोटींपैकी ४५ हजार कोटी शेतकऱ्यांसाठी आहेत. मात्र महाराष्ट्राचा ७.५ लाख कोटींचा अर्थसंकल्प असूनही केवळ ९ हजार कोटी रुपयांचीच तरतूद कृषी क्षेत्रासाठी केली जाते. कोणीच प्रश्न विचारत नाही.”

Local Body Elections : राजकीय पक्षांची घुसमट संपुष्टात; प्रशासक राज संपणार!

“शेतकऱ्यांवर अन्याय सुरू असताना, आत्महत्या होत असताना कुणालाही राग येत नाही. राग येण्याची प्रक्रिया थांबली आहे की काय, असा प्रश्न पडतो. आता रस्त्यावर उतरावेच लागेल. ही लढाई सोपी नाही, छातीवर दगड ठेवावा लागतो. ५६ इंचांच्या छातीची चर्चा होते, पण आमच्या कार्यकर्त्यांची छाती त्याहून दहा पट मजबूत आहे,” असेही ते म्हणाले.

Local Body Elections : नव्या लोकसंख्येनुसार फेरबदल; राजकीय उलथापालथीची शक्यता

“देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सरकार सांगते; पण ग्रामीण भागातील नागरिकांना अजूनही हक्काचे घर मिळालेले नाही. शेतमालाला भाव नाही, रोजगार हमी योजनेतील मजुरीमध्ये आठ वर्षांत फक्त १०० रुपयांची वाढ झाली. २०१७ मध्ये दररोज २०० रुपये मिळत होते, आता ३०० रुपये. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पगार २०१० मध्ये ५५ हजार होता, तो आता अडीच लाख रुपये झाला आहे. हे विषम चित्र आहे. सरकारला प्रश्न विचारलेच पाहिजेत, पण कुणी विचारत नाही,” अशा शब्दांत कडूंनी संताप व्यक्त केला.