Ajit Pawar said that action will continue until terrorism is ended : सैनिकांच्या पाठीशी देशाच्या एकीची भक्कम ताकद
Mumbai : पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात भारताने कणखर भूमिका घेतली. काल मध्यरात्रीनंतर ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. या हल्ल्यात दशहतवाद्यांचे ८ तळ उद्धवस्त करण्यात आले. ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या सर्व सैनिकांचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
देश एकजुटीने सैनिकांच्या पाठीशी उभा आहे. आपल्या देशाच्या सैनिकांवर प्रत्येक भारतीयाचा विश्वास आहे. पाकिस्तानचा दहशतवाद आता सहन केला जाणार नाही, हे भारताने सिद्ध केले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात निष्पाप नागरिक ठार झाले. या हल्ल्यानंतर देश संतप्त झाला होता. हल्ल्याची जबाबदारी लष्कर – ए – तैयबा आणि जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनांनी घेतली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने भल्या पहाटे ऑपरेशन सिंदूर राबवले.
Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, केंद्राचा निधी यायचा असेल तर राज्याचा वापरा, पण…
भारतीय सैन्याने नियोजनबद्ध आणि अजूक हल्ले केले. या हल्ल्याने दहशतवाद्यांचा बिमोड झाला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद पूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत अशीच कारवाई भारताकडून होत राहिल, हा संदेश आपण दिला आहे. भारतीय वायुसेना, नौसेना आणि थलसेनेच्या नेतृत्वाचे आणि सैनिकांचे अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
DCM Ajit Pawar : अजितदादांनी भाकरी फिरवली, अकोल्यात मोठा बदल
राजकीय इच्छाशक्ती..
देशवासीयांच्या एकजुटीतून ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याला पूर्ण मोकळीक दिली आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. त्यामुळे हे ऑपरेशन यशस्वी झाले. देशाच्या सीमेच्या पलिकडे जाऊन अशी कारवाई करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती लागते. ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवली, असे म्हणत अजित पवार यांनी मोदींचेही अभिनंदन केले आहे.