Nitin Raut said Congress supports for the elimination of terrorists and self-respect : जनतेच्या हितासाठी आवश्यक पावलं सरकारनं उचलावी
Nagpur : पहलगाम हल्ल्याच्या उत्तरात भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान जशास तसे उत्तर दिले. त्यानंतर कुठे देशभरात उसळलेली संतापाची लाट ओसरू लागली आहे. देशभरातून या कारवाईचे समर्थन करण्यात आले. विरोधी पक्षांनीही केंद्र सरकार आणि भारतीय सैन्याचे या कारवाईसाठी अभिनंदन केले.
यासंदर्भात राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ. नितीन राऊत म्हणाले, सध्या युद्धजन्य स्थिती झालेली आहे. काँग्रेसने काल (७ मे) बैठक घेऊन या कारवाईला समर्थन दिलं आहे. हे देशाचे युद्ध आहे. या युद्धाला आमचे पूर्णपणे समर्थन आहे. देशात भावनिक वातावरण तयार करणे आणि आपण प्रत्यक्ष देशासाठी लढणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मला वाटत नाही की, या दोन्ही गोष्टींचा आपसात संबंध आहे.
Local Body Elections : भाजप म्हणतेय, ‘निवडणुका आम्हीच जिंकणार’!
आता निर्णय सरकारने घ्यायचा आहे. देशातील जनतेच्या हितासाठी जे आवश्यक आहे, ती पावंल सरकारने उचलायला पाहिजे. जे सैनिक देशासाठी लढतात त्यांना आम्ही शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या बलिदानवादाला अभिवादन केलं आहे. काँग्रेस पक्षाने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्र सरकारला समर्थन दिलं आहें. देशाचा स्वाभिमान राखण्यासाठी समर्थन दिलं आहे, असेही डॉ. नितीन राऊत म्हणाले.
Operation Sindoor : थरार अनुभवणारे पर्यटक म्हणाले, ‘जय हिंद की सेना’!
या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव देण्यात आलं. या नावामुळे हल्ल्यात ज्या बहीणींचे पती मरण पावले, त्या महिला भावूक झाल्या. ‘ऑपरेशन सिंदूर’ नाव दिल्याबद्दल महिलांनी सरकारच्या संवेदनशीलतेचे कौतुक केले. महिलांसाठी ‘सिंदूर’ या शब्दाचं काय महत्व आहे, हे सरकारने जाणले, याबद्दल सरकारप्रति कृतज्ञता व्यक्त केली.