Citizens angry in Esoli Circle : ईसोली सर्कलमधील वीज ग्राहकांचा महावितरणवर संतापाचा स्फोट
Buldhana गेल्या काही महिन्यांपासून विजेच्या समस्यांनी हैराण झालेल्या ईसोली सर्कलमधील ग्रामस्थांनी अखेर संतापाचा स्फोट करत २७ मे रोजी अमडापूर येथील महावितरण कार्यालयावर जोरदार मोर्चा काढला. “आमच्या समस्या सोडवा, अन्यथा खुर्च्या रिकाम्या करा!” अशा प्रखर घोषणांनी परिसर थरारला.
ईसोली परिसरात सतत लपंडाव खेळणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. प्रचंड उकाड्यामुळे लोकांचे हाल होत असताना, विजेच्या वारंवार खंडित होणाऱ्या पुरवठ्यामुळे जनतेचा संयम सुटला आहे. विशेषतः अवकाळी पावसामुळे गावठाण आणि कृषी फिडर बंद पडल्याने ही समस्या अधिक तीव्र झाली आहे.
Ravikant Tupkar : तुपकरांची आता ‘किसान आर्मी’, सरकारला इशारा
ग्रामस्थांनी सांगितले की, तक्रार करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांना फोन केला तरी तो घेतला जात नाही. घेतल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. जळालेले मीटर बदलले जात नाहीत, अनियमित आणि अंदाजावर आधारित बिलं पाठवली जात आहेत. नवीन कनेक्शन देताना ‘ओव्हरलोडिंग’चे कारण देऊन नागरिकांना वेटिंगवर ठेवले जात आहे.
या सर्व कारणांमुळे ग्रामस्थांनी थेट कार्यालयावर धडक देत आपले रोष व्यक्त केला. संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, मागण्या त्वरीत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या वेळी देण्यात आला.
Eknath Shinde Shiv Sena : समस्या सोडवल्या नाही तर उलटं टांगण्यात येईल, शिवसेनेचा इशारा
या आंदोलनात ईसोलीसह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
महावितरण प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.