Breaking

Plane Crash : विमानाच्या लोखंडाचे पत्रेही वितळले, पण भगवद्गीता सुखरूप; ‘हे’ आहे कारण !

265 dead, The iron sheets of the plane melted, but the Bhagavad Gita survived : विमानाचे अवशेष आणि मृतदेह काढण्याचे काम सुरू

भगवद्गीता हा एक पवित्र ग्रंथ. या ग्रंथाची महती वेगळी सांगण्याची गरज नाही. अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर तेथून विमानाचे अवशेष आणि मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. या अपघातात २६५ लोक जळून राख झाल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळावर परिस्थिती इतकी भीषण आहे की, विमानाच्या लोखंडाचे पत्रेही पूर्णपणे वितळले आहे. अशात एक आश्चर्यकारक अन् चमत्कारीक घटना समोर आली आहे.

मृतदेह, विमानाचे अवशेष आणि मलबा काढण्याचे काम तेथे युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना एका व्यक्तीला तेथे भगवद्गीता सापडली. चमत्कार आणि आश्चर्य म्हणजे हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये जवळपास सर्व लोक जळून राखरांगोळी झाली. विमानाचे जाडच्या जाड पत्रेही पूर्णपणे वितळले. पण भगवद्गीता जशीच्या तशी राहीली. येवढ्या मोठ्या अपघातात एखाद्या पुस्तकाचे एक पान, एक कोपराही जळू नये किंवा फाटू नये, याचे आताही अनेकांना आश्चर्य वाटते आहे.

Ahmedabad plane crash : अकल्पनीय दुर्घटनेत सर्वच उद्ध्वस्त, करोडो रुपयांचं करायचं काय ?

सर्वकाही जळून राख झाल्यानंतर भगवद्गीता सुखरुप राहणे, हा इश्वराचा चमत्कार असल्याची लोकांचा भावना तयार झाली आहे. ही भगवद्गीता एखाद्या प्रवाशाची असू शकते. यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे. मलबा काढत असताना एका ढिगाऱ्यात ही भगवद्गीता सापडल्याचे बचाव कार्य करणाऱ्यांनी सांगितल्याची माहिती आहे. आता ही भगवद्गीता विमानातील एखाद्या प्रवाशाची आहे की आधीच दुर्घटनास्थळी होती, यावर वेगवेगळे विचारप्रवाह समोर येत आहेत. पण अधिकाधिक लोक याला इश्वराचा चमत्कार मानत आहेत. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना लोकांची श्रद्धा बळकट करणारी ठरली असल्याचेही काहींचे म्हणणे आहे.