Breaking

Vijay Wadettiwar : शरद पवारांच्या बोलण्याचे दोन-तीन अर्थ असतात, त्यामुळे…

NCP President Sharad Pawar’s speech has two or three meanings : स्पष्टता येत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर बोलणं योग्य नाही

Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी युती आणि आघाडीची चर्चा जोर धरत आहेत. भारतीय जनता पक्ष सोडून इतर कुठल्याही पक्षासोबत युती होऊ शकते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातून बाहेर आली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. शरद पवार गटाने युतीसाठी अजित पवार गटाचाही पर्याय खुला ठेवला असल्याचे सूत्र सांगतात. ही माहिती मिळाल्यानंतर युती आणि आघाडीबाबत अनिश्चितता समोर येईल, असे चित्र सध्या आहे.

यासंदर्भात आज (ता. १४ जून) काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, पवार साहेब काय बोलतात, त्याचे दोन-तीन अर्थ निघतात. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची (शरदचंद्र पवार) भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत यावर बोलणे योग्य होणार नाही. आघाडीबाबत स्थानिक स्तरावर नेत्यांनी निर्णय घ्यायचा आहे, तो त्यांनी घ्यावा. तिकडे एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहेत. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांसोबत ते आघाडी करतील की नाही, यावर आत्ताच बोलता येणार नाही. त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये, त्यासाठी थोडा धीर धरावा, असे वडेट्टीवार म्हणाले.

Sanjay Raut on Plane Crash : सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का?

जेव्हा आमचं सरकार आलं होतं, तेव्हा ३९ हजार कोटींचं कर्ज माफ केलं होतं. जे नियमित कर्ज भरतात, त्यांनाही मदत करण्याचं धोरण आमच्या सरकारचं होतं. आता हे सरकार काय दिवे लावणार, हे सर्वांच्याच लक्षात येत आहे. केवळ वेळ मारून नेण्याचं काम हे सरकार करत आहे. एक्साईज ड्युटी वाढवून १४ हजार कोटी मिळवावे लागले. मुंबईतील जमिनी अडाणीला दान दिल्या जात आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Local Body Elections : गडचिरोली ते बुलढाणा… भाजपकडून निवडणुकीची जोमाने तयारी!

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी महाविकास आघाडीकडून आमदार रोहित पवार स्वतः गेले होते. शरद पवार यांनी स्वतः फोन केला होता. काँग्रेसची भूमिका आम्ही यापूर्वीच स्पष्ट केली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. जो कुणी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढेल, त्याला आमचा पाठिंबा असेल. म्हणूनच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.