After renouncing food, Bachchu Kadu will now also renounce water : सर्व कार्यकर्त्यांसोबत बसून करणार चर्चा
Amravati : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग, ग्रापंचायत कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी महत्वाच्या मागण्या केलेल्या आहेत. काल (ता. १३ जून) आंदोलनाच्या सहाव्या दिवशी काही घडामोडी घडल्या. राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनस्थ गुरूगुंज मोझरी येथे भेट दिली आणि बच्चू कडू यांचे मोबाईल फोनवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे करून दिले.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर हे आंदोलन थांबेल अशी अपेक्षा असताना, आज यामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर बसलेले बच्चू कडू यांनी आता मागण्या मान्य न झाल्यास येत्या १६ जूनपासून जलत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाला तीव्र स्वरूप देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. पण यासाठी ते सर्व कार्यकर्त्यांसोबत बसून चर्चा करणार आहेत, असेही बच्चू कडू यांनी आज (ता. १४ जून) सांगितले.
Anil Deshmukh : ‘दाभडी’तील ‘चाय पे चर्चा’ कुठे गेली? मोदींना करवून दिली आठवण !
बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे, तसे त्यांचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर आक्रमक होत चालले आहेत. पुण्यात अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना मज्जाव केल्याने तेथे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अजित पवार आंदोलकांना उत्तर देत होते, पण पोलिस अडवत असल्याने कार्यकर्ते आणखी आक्रमक झाले. अखेरीस आंदोलकांना स्वारगेट पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आले.
Prahar’s Agitation : बच्चू कडू ऐकतील, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास !
आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त..
बच्चू कडू यांचे आंदोलनस्थळ असलेल्या अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील गुरूकुंज मोझरी येथे २००च्या वर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. यामुळे तेथे पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. त्यांचे कार्यकर्ते विविध ठिकाणी आंदोलन करत असल्यामुळे सर्वत्र पोलिसांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.