Breaking

Prahar’s Agitation : बच्चू कडूंसाठी जरांगेंचे आवाहन, मराठ्यांनी कंबर कसली !

Manoj Jarange’s appeal for Bachchu Kadu, Marathas will do Chakka Jam : तालुक्यातालुक्यांमध्ये उद्याच्या चक्का जाम आंदोलनाची तयारी सुरू

Nagpur : महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या महत्वाच्या प्रश्नांसाठी राज्याचे माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी ८ जूनपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनसाठी त्यांनी अमरावती जिल्ह्याच्या गुरूकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाधीस्थळ गुरूकुंज मोझरी हे स्थळ निवडले. त्यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), स्वाभीमानी शेतकरी संघटना आदींनी यापूर्वीच बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा जाहिर केला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारला सळो की पळो करून सोडणारे मनोज जरांगे पाटील हेसुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांच्यासोबत आहेत. काल त्यांनी राज्यभरातील मराठा समाजाचे कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर यांच्यासह सर्व नागरिकांना जात, धर्म, पंथ विसरून शेतकऱ्यांच्या या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. उद्या (ता. १५ जून) चक्का जाम आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करायचे असल्याचेही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलेले आहे.

Prahar’s Agitation : बच्चू कडू आता जलत्यागही करणार, आंदोलन होणार तीव्र !

जरांगे पाटील यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. तालुक्यातालुक्यांमध्ये उद्या चक्का जाम आंदोलनाची तयारी सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा सेवकांनी कंबर कसली आहे. आज (ता. १४ जून) दुपारी साडेचार वाजता उमरखेड पोलिस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी, उमरखेड आणि तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार आहे. यासाठी सकल सर्वपक्षीय नेते, शेतकरी, मराठा सेवक, सर्व सामाजिक संघनांचे पदाधिकारी आणि जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि मराठा सेवक सरोज देशमुख यांनी कळवले आहे.