Demand to deliver seeds, fertilizers and crop insurance to farmers immediately : वंचित बहुजन आघाडीची मागणी; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक
Buldhana शेतकऱ्यांवरील अन्यायाचा प्रश्न वंचित बहुजन आघाडीने एकवटला असून जळगाव जामोदचे तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवांवरील असंतोष या निवेदनाद्वारा मांडण्यात आला असून त्याची प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा, जिल्हा कृषी अधिकारी व तहसीलदार जळगाव जामोद यांनासुद्धा दिली गेली आहे.
वंचित बहुजन आघाडीने केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये बी-बियाणे तातडीने वाटप करणे, शासनाच्या दरांनुसार शेतकऱ्यांना खते मिळवून देणे, शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा रक्कम त्वरित वर्ग करणे या गोष्टींवर भर दिला आहे. २०२२-२३ व २०२३-२४ या तीन हंगामांमध्ये शेतकऱ्यांना २५ टक्के पिकविमा परत करण्यात आला आहे. तरीही उर्वरित ७५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनही वर्ग केलेला नाही. ही शिल्लक रक्कम तातडीने दिली जावी, बोगस बियाणे विकणाऱ्या केंद्रांवर कारवाही करण्यात यावी, शेतकऱ्यांना एक रुपया दराने पिकविमा दिला जावा, अशी प्रमुख मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
A new disease of cracks on hands : हाताला भेगा पडताय? घाबरण्याचे कारण नाही!
निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष रमेश नाईक, ज्येष्ठ नेते साहेबराव भगत, तालुका महासचिव भागवत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय तायडे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष पार्वताबाई इंगळे, युवा तालुका अध्यक्ष राजरत्न वाकोडे, शहराध्यक्ष आझम कुरेशी, युवा शहराध्यक्ष प्रवीण तायडे, सम्यक विद्यार्थी आन्दोलनचे जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर, जिल्हा सदस्य स्वप्निल गवई, असमत खान, मीडिया प्रमुख रविंद्र जाधव, राजेश तायडे, जयकुमार डोंगरदिवे, प्रकाश जवंजाळ, आनंदा गवई, प्रवीण कडूतायडे, भासकर जुमडे, अमोल तायडे, ज्ञानेश्वर कोकाटे, प्रदीप वानखडे, सुदाम गवई आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.