Samajwadi Party’s leader Abu Azmi was severely insulted by Chief Minister : मेक इन इंडियाच्या बाबतीत राहुल गांधींनी होमवर्क करावं
Nagpur : महाराष्ट्रात विविध वाऱ्यांमुळे रस्ते जाम होतात. पण मुस्लीम समाज कधी त्याची तक्रार करत नाही. मात्र मुसलमानांनी रस्त्यावर नमाज पठण केलं तर तक्रार केली जाते, असं वक्तव्य समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केलं. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी अबू आझमी यांची लायकीच काढली.
मुख्यमंत्री फडवीस म्हणाले, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांना वादग्रस्त विधाने करण्याचा शौक आहे. वादग्रस्त विधाने केले की प्रसिद्धी मिळते, असा त्यांचा समज आहे. अबू आझमीच्या फालतू वक्तव्याला मी उत्तर देणार नाही. कारण ते प्रसिद्धीच्या लायक नाही, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमीची लायकी काढली.
Eknath khadse : खडसेंनी सुनावले, पूर्वीची भाजप भ्रष्टाचार आणि गुन्हेगारमुक्त होती
नागपुरात आज (ता. २२ जून) पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाही सल्ला दिला. ते म्हणाले, आपल्या देशात काय काय बनते, हे राहुल गांधींना माहिती नाही. मेक इन इंडिया त्यांना माहिती नाही. जोपर्यंत काँग्रेसचे सरकार होते, तोपर्यंत भारताची अर्थव्यवस्था ११व्या क्रमांकावर होती. गेल्या १० वर्षांत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी होमवर्क करावं.
Sanjay Raut : ट्रम्प मोदींचे मित्र पण भारताचे शत्रू, कसे ते संजय राऊतांनी सांगितले !
नागपूरच्या विविध प्रकल्पांचा आढावा आजच्या बैठकीत घेतला आहे. नाग नदीवर एसटीपी करण्यासाठी अंडरग्राऊंड वीज, वाहन तळासाठी शहराबाहेर वाहनतळ आदी विषयांवर चर्चा झाली आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता जोडला जाणार आहे. काही ठिकाणी सहा पदरी तर काही ठिकाणी चार पदरी रस्त्याला मान्यता दिली आहे. जळगावला समृद्धी महामार्गाशी जोडले जाईल. मोठ्या प्रमाणात रोड नेटवर्क तयार केले जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कुंभमेळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोड नेटवर्क तयार करण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन प्रमुख आठ रस्ते बनवण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगर ते नाशिक, नागपूर ते नाशिक आणि नाशिकला जोडणाऱ्या सगळ्या रस्त्यांसंदर्भात आज बैठक पार पडल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.