Breaking

Iran- Israe War : युद्धामुळे पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दराचा भडका उडण्याचा धोका !

US attacks on Iran, fuel supply likely to be disrupted : इराणवर अमेरिकेचे हल्ले, इंधन पुरवठा थांबण्याची शक्यता

New Delhi: इराणच्या तीन अणुप्रकल्पांसह मोक्याच्या ठिकाणी अमेरिकेने हल्ले चढवले. परिणामी जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक पट्ट्यातून इंधन पुरवठा थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच नाही तर गॅस सिलेंडर महागण्याचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय स्वयंपाक घरात उपयोगात येणाऱ्या सिलेंडरसाठी लागणाऱ्या गॅस पैकी बराच गॅस हा पश्चिम आशियातून येतो. भारतात सध्या 16 दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याचे सांगितले जात आहे.

इराण-इस्त्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेतली. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे युद्ध वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक पट्ट्यातून इंधन पुरवठा थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेट्रोल-डिझेलच नाही तर गॅस सिलेंडरच्या किंमती भडकण्याची दाट शक्यता आहे. यावर उपाय योजना न झाल्यास, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोचू शकते.

Obscene behavior : फिटनेस सर्टिफिकेटसाठी महिलेला नको तिथे ‘ टच’

इराणच्या अणुप्रकल्प ठिकाणांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक क्षेत्रातून इंधन पुरवठ्यात अडथळा आला आहे. पश्चिम आशियातील या क्षेत्रात तणाव वाढला आहे. इंधनासह एलपीजीच्या किंमती वाढण्याची भीती आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे

गेल्या एका दशकात सरकारच्या प्रयत्नानंतर भारतात एलपीजीचा वापर जवळपास दुप्पट झाला आहे. 33 कोटी घरात एलपीजी गॅसचा वापर करण्यात येतो. भारत यासाठी दुसर्‍या देशांवरच अवलंबून आहे. एकूण एलपीजीचा जवळपास 66 टक्के वाटा परदेशाचा आहे. त्यातील जवळपास 95 टक्के वाटा हा सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात आणि कतार या पश्चिम आशियातील देशामधील आहे. भारताकडे 16 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा करण्याची यंत्रणा आहे त्यामुळे गॅसची आवक न झाल्यास पुढे काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

Manikrao Kokate: शेती परवडत नाही, आम्ही अपयशी ठरलो..

प्राप्त माहितीनुसार पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताकडे आयात टर्मिनल, रिफायनरीज आणि बॉटलिंग प्लँट्समध्ये केवळ 16 दिवस पुरेल इतक्याच साठ्याची क्षमता आहे. तर पेट्रोल आणि डिझेलबाबत भारत हा निर्यातदार झाला आहे. भारत कच्चे तेल आयात करतो. त्यावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करण्यात येते. आता जर हे युद्ध अजून ताणल्या गेले अथवा या युद्धात रशिया, चीन पैकी कोणी उतरलं तर युद्ध दीर्घकाळ चालण्याची भीती आहे. त्यामुळे इराणमधील इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल. भारताने अमेरिकेकडून इंधन आयात कमी केली आहे. रशिया आणि पश्चिम आशियायी देशातून ती वाढवली आहे. युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्यास गॅससह पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.