Sushma Andhares post on Thackeray brothers unification : ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणावर सुषमा अंधारे यांचे सूचक पोस्ट
Mumbai: राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील एकत्रीकरणा संदर्भात गेल्या काही दिवसापासून चांगली चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय राऊत हे शिवसेना ठाकरे गट युतीबाबत सकारात्मक असल्याचे वक्तव्य रोज करतात. दरम्यान मनसेचे संदीप देशपांडे हे वेगवेगळे वक्तव्य करून संभ्रम निर्माण करत आहेत यावर सुषमा अंधारे यांनी ट्विट करत संयमाचा संदेश दिला आहे
सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. सेना-मनसे युती होण्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितापुढे सगळ्या प्रकारच्या टीकाटिप्पणी शुल्लक आहेत. सर्व शिवसैनिकांना आवाहन. आपण संयमी नेतृत्वाचे शिलेदार आहोत. मराठी माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जबाबदारीचे भान ठेवून शिवसैनिकांनी व्यक्त व्हावे. आदेशावरुन, असे सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
Railway station : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे की महात्मा फुले रेल्वे स्टेशन!
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. राज ठाकरे यांनी सर्वप्रथम, ‘महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हा भावांमधील वाद मी बाजूला ठेवायला तयार आहे’, असे वक्तव्य केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तेव्हापासून ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर मनोमीलन सुरु झाले होते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक राज ठाकरे यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट घेतल्याने ठाकरे गट-मनसेच्या युतीबाबत साशंकता निर्माण झाली होती.
त्यानंतर मनसेचे संदीप देशपांडे हे सातत्याने ठाकरेंविरोधात आक्रमक वक्तव्य करत आहेत. या टीकेला संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले होते. देशपांडे आणि राऊत यांच्यातील या शाब्दिक वादामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याच्या शक्यता मावळत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
Gadchiroli News : क्या हुआ तेरा वादा…! म्हणत लेकीचे, आमदार वडिलांविरोधात ठिय्या आंदोलन!
संदीप देशपांडे यांनी सोमवारी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यामध्ये संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली होती. होय आम्ही नवीन आहोत, पण कधी ‘केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत.’जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा’, असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी 20 हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटली, अशी बोचरी टीका संदीप देशपांडे यांनी केली होती.