Breaking

Harshawardhan Sapkal : वारकरी संप्रदायाने आध्यात्मिक क्रांती घडवली !

Congress prays to Lord Vitthal for unemployed farmers and women on pune solapur road : समता, बंधुता, सामाजिक न्याय मुल्यांची केली पेरणी

Pune : महाराष्ट्र धर्म वाचवायचा असेल तर वारीत सहभागी होणे गरजेचे आहे. संत साहित्य, बहुजन हिताय – बहुजन सुखाय हे अनुभवण्यासाठी काँग्रेसजन पालखीत सहभागी झाले. देशात समाजवाद व बंधुत्व यांचे संवर्धन व संरक्षण झाले पाहिजे, ही आमची अभिलाषा आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखी सोहळ्यात सपकाळ यांनी आज (ता. २४ जून) विठुरायाचे नामस्मरण करत सहभाग घेतला. पुणे – सोलापूर महामार्गावरील यवत या गावातून दिंडी क्रमांक २८२मध्ये ते आपल्या सहकाऱ्यांसह सहभागी झाले आणि दिंडीत पायीही चालले. वारकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, वारकरी संप्रदायाने समता, बंधुता, सामाजिक न्याय आदी मुल्यांची पेरणी करत समतेचा मोठा संदेश समाजाला देऊन आध्यात्मिक क्रांती घडवली आहे. भारताचा संग्रामही याच विचाराने प्रभावित होता.

Harshawardhan Sapkal : आधी चक्की पिसींग-पिसींग अन् आता गळ्यात गळे घालींग-घालींग !

स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानामध्येही हाच विचार संमिलित झालेला आहे. पुढे याच विचारावर महाराष्ट्र धर्म स्थापन झाला. आज महाराष्ट्र धर्म वाचवायचा असेल तर वारीत सहभागी होणे गरजेचे आहे. राज्यातील शेतकरी आज हवालदिल झाला आहे, अवकाळी पावसाने शेतांतील उभी पिके वाया गेली आहेत, शेतमालाला भाव मिळत नाहीये, शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो, महिलांवरील अत्याचार कमी होवो आणि विश्र्वात्मके देवे ही संकल्पना साकार करण्याच्या अनुषंगाने दुरितांचे तिमिर जावो, विश्र्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, अशी प्रार्थना पांडुरंगचरणी सपकाळ यांनी केली.

Harshvardhan sapkal : सोमय्यांवर बेकायदेशीर कृत्यासाठी गुन्हा दाखल करा!

पालखी सोहळ्यात हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंत शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, संजय बालगुडे, अजय छाजेड, प्रवक्ते गोपाल तिवारी, प्रकाश सोनावणे, अमर खानापूरे, श्रीरंग बर्गे, पृथ्वीराज पाटील आदी सहभागी झाले होते.