Demand to the Commissioner to issue directions to recover illegal birth certificates : बेकायदेशीर प्रमाणपत्रे परत मिळवण्याचे निर्देश देण्याची मागणी
Akola अकोला शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे नायब तहसीलदार कार्यालयाच्या आदेशाने दिली गेलेली सुमारे २२०० जन्म प्रमाणपत्रे अकोला महानगरपालिकेने रद्द केली आहेत. मात्र ही प्रमाणपत्रे संबंधित नागरिकांकडून परत घेण्याची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असून, आजपर्यंत केवळ ८२ नागरिकांनीच प्रमाणपत्रे परत केली आहेत. यावरून प्रशासनाची कार्यक्षमता आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गुरुवारी सायंकाळी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी नाराजी व्यक्त करत दहा दिवसांची मुदत दिली आणि सर्व प्रमाणपत्रे परत मिळवण्याचे निर्देश देण्याची मागणी आयुक्तांकडे केली.
Kirit Somaiya : ३०० हून अधिक जन्मदाखले बेकायदेशीर; सोमय्यांचा मोर्चा बुलढाण्याकडे
यापूर्वी अकोला महानगरपालिका क्षेत्रात तहसील कार्यालयाच्या आदेशावर आधारित जन्म-मृत्यू नोंदीची प्रमाणपत्रे वितरित केली जात होती. मात्र, काही बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती.
यानंतर अकोला तहसील कार्यालयाने महापालिकेला पत्र पाठवून संपूर्ण प्रकरणाची छाननी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेने सात हजारांहून अधिक प्रमाणपत्रांची तपासणी केली. यामध्ये २७१३ प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली. त्यापैकी २१८६ आधीच वितरित झाली होती, तर ५२७ प्रमाणपत्रे अद्याप वितरित न होता प्रलंबित होती.
Sudhir Mungantiwar : लोकशाहीची हत्या करणारी काँग्रेसी वृत्ती नष्ट करण्याचा संकल्प करावा
महापालिकेने रद्द केलेल्या २१८६ वितरित प्रमाणपत्रांपैकी केवळ ८२ नागरिकांनीच ती परत केली आहेत. ११०९ नागरिकांशी संपर्क साधण्यात आला असला, तरी उर्वरित १००० हून अधिक नागरिक अद्यापही संपर्काबाहेर आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया अत्यंत मंद गतीने सुरू आहे, ज्यामुळे प्रशासनावर टिकाही होत आहे.
Hindi Language Conflict : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र!
महापालिकेत गुरुवारी झालेल्या बैठकीत सोमय्यांनी आयुक्त लहाने यांच्याकडे दहा दिवसांत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. यासोबतच फसवणुकीस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर गुन्हेगारी स्वरूपात कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.