Solar damage due to rain : मुख्यमंत्र्यांच्या दालनात आत्महदन करण्याचा इशारा

Suicide threat in Chief Minister’s office : वादळी पावसाने साेलरचे नुकसान; सोलर कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी

Dongao वादळी पावसाने साेलरचे नुकसान झाले. नुकसानाविषयी साेलर कंपनी तसेच मुख्यमंत्री तक्रार निवारण पाेर्टलवर तक्रार केली. मात्र, या तक्रारीची दखलच घेण्यात आली नाही. त्यामुळे, जी.के. सोलर कंपनीविरुद्ध फौजदारी कारवाई करून नुकसानभरपाई मिळवून द्या, अशी मागणी बेलगााव येथील वेणुताई भागवत वानखेडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले निवेदनात केली आहे. तसेच मागणी मान्य न झाल्यास १ सप्टेंबर राेजी मुख्यमंत्र्यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनात दिला आहे.

निवेदनात वेणूताई वानखेडे यांनी म्हटले आहे की, “मी माझ्या शेतात जी.के. सोलर कंपनीमार्फत सोलर मोटर पंप बसवून घेतला होता. मात्र, २६ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे माझ्या सोलर पॅनलचे पूर्णपणे नुकसान झाले. सदर घटनेनंतर मी तात्काळ कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली. तसेच मुख्यमंत्री तक्रार निवारण पोर्टलवरदेखील तक्रार केली असून, तिचा क्रमांक 0000030184545 असा आहे.”
तक्रारीनंतरही कंपनीकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही, असे त्या पुढे म्हणतात. “कंपनीचे प्रतिनिधी शंकर मोरे आणि अंकुश जाधव यांना वारंवार कळवूनही त्यांनी उद्धट आणि आरेरावीची भाषा वापरली. आजपर्यंत मला कोणतीही मदत, तांत्रिक सेवा किंवा पॅनल बदलून देण्यात आलेले नाही. परिणामी मला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे आणि माझे शेतकाम प्रभावित झाले आहे.”

Local Body Elections : प्रारूप प्रभाग रचना जाहीर, काहींची राजकीय प्रतिष्ठा पणाला

“सदर कंपनीने ग्राहकांची फसवणूक करून विश्वासघात केला आहे. त्यामुळे संबंधित कंपनीवर फौजदारी कारवाई करून मला नुकसानभरपाई द्यावी. तसेच ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत मला सोलर पंप बदलून द्यावा व झालेल्या नुकसानीची भरपाई करावी. अन्यथा मी ०१ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री साहेबांच्या दालनात आत्मदहन करेन,” असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.