Breaking

MLA Pravin Tayde : अचलपूरच्या आमदाराविरुद्ध प्रहार आक्रमक!

अमरावती

PRAHAR aggressive on BJP : पोलीस अधिक्षकांकडे फौजदारी कारवाईची मागणी

राजकारणाची पातळी खालावत चालली आहे, त्याचा प्रत्यय अमरावतीमधील Amravati अचलपूर Achalpur मतदारसंघात सातत्याने येत आहे. अचलपूरमध्ये दोन्ही बाजुंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यात नेते व कार्यकर्ते वैय्यक्तिक टीका करत आहेत. माजी मंत्री तथा प्रहार पक्षप्रमुख बच्चू कडू Bachhu Kadu यांच्याविरोधात चिथावणीखोर व अश्लील भाष्य करणारे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी करीत प्रहारचे कार्यकर्त्ये आक्रमक झाले आहेत. पोलीस अधीक्षकांची भेट घेत भाजप आमदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

‘प्रहार’चे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू यांच्या नेतृत्वात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांची मंगळवारी भेट घेतली. तथा त्यांना निवेदन दिले. 30 डिसेंबर रोजी माध्यमांशी बोलताना आमदार तायडे यांनी बच्चू कडू यांच्याविरुद्ध खोटे आरोप-प्रत्यारोप करून त्यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच मारहाण करण्याची धमकीदेखील दिली.

कडूंनी वेळ सांगावी, कार्यकर्ते घेऊन यावेत, असे चिथावणीजनक भाषण केले. त्यांचे ते वक्तव्य सामाजिक तेढ निर्माण करणारे असल्याचे प्रहार कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. आमदारांच्या पोस्टरशी बच्चू कडू यांचा कुठलाही संबंध नसताना आमदार तायडे यांनी बेकायदेशीर कथन केले आहे. कडू यांना अश्लील शिवीगाळ केल्याने प्रहार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

विद्यमान आमदाराचे ते कृत्य बेकायदेशीर असून, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी राजेश वाटाणे, सुरेश गणेशकर, जितू दुधाने, नंदकिशोर कुयटे, प्रशांत शिरभाते, शैलेश निरगुळे, अभिजित देशमुख, प्रशांत शिरभाते, श्याम इंगळे, नितीन शिरभाते, विनोद केवदे व अन्य कार्यकर्त्यांनी केली आहे.

प्रहार-भाजपमध्ये दुरावा

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार विरोधात बंड करणाऱ्या आमदारांमध्ये प्रहारचे बच्चू कडू आघाडीवर होते. भाजपला साथ देत त्यांनी गोडवा निर्माण केला होता. लोकसभा निवडणुकीपासून मात्र भाजप आणि प्रहार यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाला आहे. बच्चू कडू यांना बंडानंतर मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आल्याचे शल्य मनात राहिले. विधानसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला. आता प्रहार व भाजपमध्ये कायमच दुरावा निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे.