व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sanjay Raut : “नीट धोतर नेसता येत नाही आणि आम्हाला अक्कल शिकवतो”

Sanjay Raut : “नीट धोतर नेसता येत नाही आणि आम्हाला अक्कल शिकवतो”

sanjay-raut-slams-bhagat-singh-koshyari-over-raj-thackeray-modi-remark : संजय राऊतांचा भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल

Mumbai : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यातील भाषिक मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादात आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे नरेंद्र मोदींना घाबरतात, अशी उपरोधिक टीका केल्यानंतर राऊत यांनी कोश्यारींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे यांनी संघाच्या कार्यक्रमांमधून राजकीय भाष्य करू नये, अशी टीका मोहन भागवतांवर केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना भगतसिंह कोश्यारी यांनी संघाच्या कार्यक्रमाला आलेले लोक मोदींना घाबरून येत नाहीत, असे म्हणत राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरले आहेत, असे वक्तव्य केले. त्यांनी राज ठाकरे माझ्या लहान भावासारखे आहेत, त्यांनी मोदींना घाबरू नये आणि जवळ जावे, अशी सूचनाही केली होती. मोदींसाठी सर्व जनता समान असल्याचे उदाहरण देत त्यांनी रामाच्या राज्याशी तुलना केली होती.

Nagpur Municipal Corporation : आधी झिडकारले, आता पाठिंबा कशाला द्यायचा? मुस्लिम लीगने काँग्रेसला सुनावले

या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत कोश्यारींवर टीका केली. “त्याला नीट धोतर नेसता येत नाही आणि तो आम्हाला अक्कल शिकवतोय,” असा टोला त्यांनी लगावला. मोदींना कोण घाबरतंय, असा सवाल करत राऊत म्हणाले की, सत्तेच्या जोरावर आणि यंत्रणांच्या बळावर कोणीही मोठेपणा दाखवू शकत नाही. संसदेत राहुल गांधींच्या भाषणावेळी पंतप्रधान आणि अमित शाह बाहेर गेले, असा उल्लेख करत त्यांनी भाजप नेतृत्वावरही निशाणा साधला.

राऊत यांनी पुढे कोश्यारींना उद्देशून, “पहिले नीट धोतर नेसायला शिका आणि मग महाराष्ट्रात येऊन आम्हाला अक्कल शिकवा,” अशी टीका केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्याबाबत कोश्यारींनी पूर्वी केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. अशा व्यक्तीला पद्मभूषण देण्यात आल्याबद्दलही त्यांनी सवाल उपस्थित केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी भाजपवरही टीका केली.

Ajit pawar plane crash : अजित पवार विमान दुर्घटनेवरून राजकारण तापले

दरम्यान, या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून राज ठाकरे, भगतसिंह कोश्यारी आणि संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. आगामी काळात या प्रकरणावर आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!