Breaking

Nana patole : काँग्रेसचा 25 जानेवारीला हल्लाबोल!

 

Congress agitation on January 24 across the state : राज्यभर महायुती सरकारच्या विरोधात आंदोलन

Mumbai – निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे. तरीही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे. त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपा व निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुकीत मतांवर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाच्या या कृत्यांविरोधात व लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर आंदोलन करणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे.

या आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेतेही सहभागी होणार आहेत. नाना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत घोटाळा झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत ५० लाख मतदार कसे वाढले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर रात्रीच्या अंधारात ७६ लाख मतदान कसे वाढले? याचे पुरावे द्यावेत अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती पण अजून ही आकडेवारी दिलेली नाही.

Vijay Wadettiwar on Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा

निवडणूक आयोगाला अशी माहिती देता येणार नाही असा कायदाच आता केंद्रातील भाजपा सरकारने केला आहे. हा कायदा म्हणजे निवडणूक आयोग व भाजपाने मतदारांच्या मतदानावर टाकलेला दरोडा लपवण्याचा प्रकार आहे.

बदलापूरच्या एका शाळेतील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी अक्षय शिंदेचे फेक एन्काऊंटर केले, हे आम्ही त्याचवेळी सांगितले होते. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. उच्च न्यायालयाने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाईचे आदेश दिले आहेत. या पोलीसांवर कारवाई झालीच पाहिजे पण या एन्काऊंटरचे आदेश मंत्रालय व पोलीस महासंचालक कार्यालयातून कोणी दिले त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.

Collectorate of amravati : आश्चर्य! महिला लोकशाही दिनाला एकही तक्रार नाही!

बदलापूर प्रमाणेच परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. पोलीसांनी कोंबिग ऑपरेशनवेळी सोमनाथ सुर्यवंशीला अटक करुन कोठडीत मारहाण केल्याने मृत्यू झाला. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली. दम्याच्या आजाराने सुर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याविरोधात हक्कभंग आणणार आहोत. पण परभणीत कोंबिंग ऑपरेशनचे आदेश कोणी दिले, त्याची चौकशी झाली पाहिजे व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली. बीड जिल्ह्यात खून, खंडणी, अपहरण, भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. बीडमधील माफियाराज सत्तेतील एका मंत्र्याच्या आशिर्वादानेच सुरु आहे. सत्ताधारी पक्षाचा एक आमदारच बीडमधील माफियाराजची माहिती जाहिरपणे देत आहे पण सरकार चौकशीचा फार्स असून सत्तेची खूर्ची वाचवण्यासाठी सरकारचा हा प्रयत्न सुरु आहे, असेही नाना पटोले म्हणाले.