The walls of 200 schools of the District Council will be made to speak : विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास होणार मदत
Wardha : जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षक विभागाच्या बाल आरेखन उपक्रम सुरू केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होऊन त्यांना सुलभ पद्धतीने शिक्षण घेता यावे, यासाठी जिल्ह्यातील २०० शांळांमधील भिंती बोलक्या केल्या जाणार आहेत.
शाळेतील सर्व भिंतींवर विविध विषयांवर आधारित चित्रे रेखाटली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत होणार आहे. अलीकडे जिल्हा परिषदेच्या शाळेबाबत बरेच गैरसमज रूढ होत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या शाळांचे रूपडे पालटून शैक्षणिक दर्जा सुधारण्यासह विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण कसे देता येईल.
शाळांतील वर्गखोल्यांत विविध रंगांमध्ये चित्रे काढली आहेत. विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपयुक्त होईल, असे पाठ भिंतीवर रंगवून विद्यार्थ्यांना शिकवणे सुरू केले आहे. हा उपक्रम शिक्षण विभागाच्यावतीने गतवर्षीपासून जिल्ह्यात सुरू करण्यात आला. मात्र, यावर्षी उपक्रमाची व्याप्ती वाढविली आहे.
Chandrashekhar Bawankule : महसूल विभागाच्या विरोधात येणाऱ्या बातम्यांचे खंडन अधिकाऱ्यांनी करावे!
विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी भिंतीवर सप्तरंगी इंद्रधनुष्य, तारांगण, चंद्र, सूर्य, आकाशमाला रेखाटली आहे. तसेच मराठी बाराखडी, मराठी-इंग्रजी महिने, व्याकरण, दिशाज्ञान, गणितीय सापशिडी, बेरीज-वजाबाकी, गुणाकार-भागाकार या गणितीक्रिया करण्यासाठी सूत्रे, वाक्प्रचार गिरविण्यात आले आहेत. पर्यावरणीय माहितीसाठी विविध प्रकारची झाडे, भौगोलिक माहिती, महाराष्ट्र व भारताचा नकाशा, विज्ञान, निसर्गविषयक माहिती, प्राणी-पक्ष्यांची चित्रे काढण्यात आली आहेत.
या ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व संगीत कलेची माहिती व्हावी, या उद्देशाने तबला, पेटी, ढोलकी, वीणा, सारंगी यांसारखी संगीतवाद्ये रंगविण्यात येणार आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजाराच्या वर शाळा आहेत. यांपैकी टप्या टप्यांत शाळांच्या भिंती बोलक्या केल्या जात आहे. बाल आरेखन हा उपक्रम गेल्या वर्षीपासून राबविण्यात येत आहे. यंदा जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील प्रत्येकी २५ शाळा अशा २०० शाळा बोलक्या केल्या जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
Bhagwat Karad : जगात सर्वोत्तम कामगिरी करणारी भारताची अर्थव्यवस्था!
ताणतणाव न घेता आनंदाने हसत खेळत शिक्षण दिल्यास त्याच्या गुणवत्ता वाढीवर परिणाम होतो. शैक्षणिक वातावरण बोलके असले, तर विद्यार्थी आपोआप त्याच्या स्वत:च्या भाषेत व्यक्त व्हायला सुरुवात होतात. त्या अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गत वर्षी ७० शाळांमध्ये हा उपक्रम राबविला, तर या वर्षी २०० शाळांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.