Farmers will be benefitted from corn : देवळी तालुक्यात १०६ हेक्टरवर लागवड
Wardha मागील काही वर्षांत जिल्ह्यासह महाराष्ट्रात मका लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामागे केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मिती धोरणाचा मोठा वाटा असून बरेच शेतकरी पशुखाद्य म्हणून याचा वापर करतात. आता कडब्याची जागा मक्याने घेतली आहे. केंद्र शासनाने इथेनॉल बनवण्यासाठी मक्याचा वापर केला जाणार असल्याचे धोरण जाहीर केले आहे.
देशभरात मोठ्या प्रमाणात इथेनॉलची आवश्यकता आहे. यातूनच राज्यात मका लागवडीचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम वर्धा जिल्ह्यातही झाला आहे. जिल्ह्यात मका लागवडीचे क्षेत्र पूर्वी अल्प होते. हे क्षेत्र आता हजार हेक्टरच्या घरात पोहोचले आहे.
मका हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक पिकणारे धान्य आहे. ते महत्त्वाचे पोल्ट्री खाद्य आहे. मक्याची लागवड शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने लागवडीकडे वळत आहेत. १२० दिवस कालावधीचे हे पीक शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळवून देण्यासह खात्रीचे पीक मानले जाते.
जिल्ह्यात मका लागवडीचे एक हजार हेक्टरच्या जवळपास इतके मोठे क्षेत्र तयार झाले आहे. या क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या तीनही ऋतूंत त्याची लागवड केली जाते. मका दळून, शिजवून तो द्रवरूपात आणला जातो. त्याचे सॅकॅरिफाईंड केले जाते. त्यानंतर डिस्टीलेशनमधून त्याचे बाष्पीभवन केले जाते.
इतर पिकांच्या तुलनेत मका लागवडीचा खर्च व उत्पन्न यात फरक आहे. उत्पन्न अधिक असल्याने लागवड केली आहे. महत्त्वाचे म्हणजे पाळीव जनावरांना बाराही महिने हिरवा चारा मिळतो, यासाठी मक्याची लागवड केली, असं शेतकरी म्हणतात.
MLA Sulbha Khodke : प्रवाहाविरुद्ध कार्य करणे हीच परिवर्तनाची नांदी
शेतकरी मका लागवडीकडे वळत आहेत. जिल्ह्यातील देवळी तालुक्यात १०६ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली गेली, पुढील काळात ही लागवड वाढण्याची शक्यता आहे.