Breaking

Vijay Wadettiwar : राजकारण आणि धर्म वेगळा रहावा, यावर डॉ. बाबासाहेबांचा जोर होता !

Dr. Babasaheb Ambedkar emphasized that politics and religion should remain separate said Vijay Wadettiwar : आज संविधानाची शपथ घेऊन एका समाजाविरोधात सतत द्वेषपूर्ण विधाने केली जात आहेत

Mumbai : संविधानात अनेक मूलभूत तत्व आहेत. त्यातील मूलभूत तत्व म्हणजे धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव. बाबासाहेबांनी राजकारण आणि धर्म वेगळा रहावा, यावर जोर दिला. त्यानुसार सरकार आणि सरकारी यंत्रणांनी सर्वांशी समान वागणे अपेक्षित आहे, पण आपल्या राज्यात संविधानाची शपथ घेऊन एका समाजाविरोधात सतत द्वेषपूर्ण विधान करत आहे. हे संविधानाला छेद देणारे आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

महाराष्ट्रात आज कोणत्याही महापालिकेत लोकनियुक्त शासन नाही. लोकप्रतिनिधी नाहीत. निवडणुका होत नाहीत, ही संविधानाची पायमल्ली आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये, शत्रूच्याही निष्पाप स्त्रीचा सन्मान करावा, हे शिकवले. त्याचवेळी स्वराज्यावर चालून येणाऱ्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायला ते घाबरले नाहीत आणि मृत्यूनंतर औरंगजेबाची कबरही त्यांनीच बांधली. महाराष्ट्रातच ती कबर आहे, हीदेखील छत्रपतींची शिकवण आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule : आमदारांना यशस्वी करावा लागेल ‘जीवंत सातबारा’!

ती कबर महाराष्ट्राच्या शौर्याची, लढाऊ बाण्याची खूण आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे बीज पेरले ती कबर त्याची अभिव्यक्ती आहे. जी कबर मराठी बाण्याचे प्रतीक आहे, ते थडगे तोडून तुम्हाला शिवरायांच्या पराक्रमाचा, संघर्षाचा इतिहास पुसायचा आहे का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला.

MLA Kailas Patil : योजना तशी चांगली पण वेंडर्समुळे थांबली!

भारतीय लोकशाही मजबूत आहे. पण सध्या मात्र द्वेषाच्या वातावरणात संविधानाला धोका निर्माण होतो आहे. त्यामुळे संविधानाला बदलता येणार नाही, जे असा प्रयत्न करतील त्यांची सत्ता बदलली जाईल, असे विजय वडेट्टीवार भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित संविधानाची गौरवशाली वाटचाल या प्रस्तावावर बोलताना म्हणाले.