Sudhir Mungantiwar’s appeal to workers on BJP’s foundation day : संघटन निवडणुका जिंकण्याचं यंत्र नव्हे, तर ते सर्वसामान्यांचं मन जिंकण्याचं यंत्र व्हावं
Chandrapur : कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे, नेता आत्मा नाही. तर नेता हा पक्षाचा चेहरा आहे. आता आपल्याला पूर्ण शक्तीने काम करायचे आहे. पुढे महानगरपालिकेची निवडणूक आहे. निवडणूक जाहिर होईल तेव्हा होईल. पण आजच काम सुरू करा, याद्या बनवा, प्रभागात पोहोचवा, असे आवाहन करत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना रामनवमी आणि भाजप स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
चंद्रपुरातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या सभागृहात आज (६ मार्च) भाजपच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, तुमच्या सर्वांचा मला मनापासून अभिमान आहे. कारण सन १९५२ मध्ये आपल्या पक्षाचे फक्त तीन खासदार होते, तेव्हा लोक चेष्टा करायचे. १९८४मध्ये खासदारांची संख्या तीनवरून दोनवर आली. तेव्हा गंमत करायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली.
Sudhir Mungantiwar : या माऊलीमुळेच होऊ शकले सुंदर ग्रामपंचायत भवन !
सत्तेसाठी मरणाऱ्यांची फौज नको
आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले की, एके काळी पक्षाची अशी स्थिती होती की लोक हसत होते. पण हसता-हसता कार्यकर्त्यांनी इतके कठीण परीश्रम केले की, आज हा पक्ष तिसऱ्यांदा सत्तेत आला. संघटन फक्त निवडणुका जिंकण्याचं यंत्र होऊ नये, तर ते सर्वसामान्य लोकांचं मन जिंकण्याचं यंत्र झालं पाहिजे. सत्तेसाठी मरणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज होऊ नये, तर पक्षाचा विचार तळागाळात पोहोचवण्याचे तंत्र झालं पाहिजे.
मेहनतीनेच पक्ष मोठा झाला..
कार्यकर्त्यांच्या प्रचंड मेहनतीनेच हा पक्ष मोठा झाला आहे. याची जाणीव ठेऊनच सर्वांना सेवेचा भाव ठेवावा लागेल. चंद्रपूरमध्ये आपल्या सर्वांची एक मोठी जबाबदारी आहे. चंद्रपूरची संघटना उत्तम व्हावी, आपण देशात क्रमांक एकवर जावे, हाच आपला प्रयत्न आहे. या जिल्ह्यात प्रगतीच्या मार्गावर जाण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला. पण अजूनही आपल्याला खूप कष्ट करावे लागणार आहेत.
Sudhir Mungantiwar : घरकुलांसाठी रेतीची अडचण, महसूल मंत्र्यांसोबत बैठक घेणार !
आणखी बरंच काम बाकी..
काल (५ मार्च) पंतप्रधान आवास योजना आणि इतर योजनांची बैठक घेतली, तेव्हा जाणवलं की, आणखी किती काम करणं बाकी आहे. ‘विकसीत भारत’ म्हणणं सोपं आहे. पण काम करणं तेवढंच कठीण आहे. आपण घरकुलाला रेती देऊ शकत नाहीये, पाणी पुरवठा योजनेला ‘जल जीवन मिशन’ म्हटलं आहे. ग्रामीण भागात योजना सुरू आहे. पण ही कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखी आहे, जी संपता संपत नाही. त्यामुळे आणखी बरंच काम करायचं आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक मेहनत करणे गरजेचे आहे, असे आमदार मुनगंटीवार म्हणाले.
Sudhir Mungantiwar : गाव, गरीब और किसान, यह भाजप की है पहचान !
पक्षाची महती..
संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान अद्याप पोहोचले नाही. आपण कधी जात, पात, धर्म, पंथ पाहिला नाही. ईद असेल तर भाजपचा कार्यकर्ता पुढे जातो. रामज्योत पेटवायची असते, तेव्हा चांदभाई पुढे येतो. ही आपल्या पक्षाची महती आहे. एक गोष्ट समजून पुढे गेले पाहिजे की, प्रत्येक पक्ष आपला विचार पोहोचवण्यासाठी काम करतो आहे. त्यामध्ये आपण सरस कसे ठरू, याचा विचार प्रत्येक कार्यकर्त्याने करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी गाजवले अर्थसंकल्पीय अधिवेशन !
संधीचे सोने केले..
महाराष्ट्रात भाजपचे दीड कोटी सदस्य झाले आहेत. ज्यावेळी माझं मंत्रीपद गेलं, तेव्हा मी ठरवलं होतं की, आता संघटनेत उत्तम काम करून दाखवेन. मला ती संधी मिळाली. त्या संधीचं मी सोनं केलं. त्यामुळे सदस्यता नोंदणीत सरासरीमध्ये महाराष्ट्रात क्रमांक एकवर बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ आहे. जे टारगेट दिलं होतं, त्याच्या १९० टक्के सदस्य नोंदणी केली.असे आमदार मुनगंटीवार यांनी नमूद केले.