Farmers waiting for loan waiver : ३१ मार्चपर्यंत पीक कर्ज भरले नाही; १३ हजार शेतकरी शून्य टक्के व्याज सवलतीला मुकले
Amravati राजकीय घोषणा आणि कर्जमाफीच्या गाजावाजामध्ये जिल्ह्यातील हजारो शेतकरी फसले आहेत. कर्जमाफी होणार, या आशेवर अनेकांनी पीक कर्जाचा भरणा न करता वाट पाहिली. परिणामी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तब्बल १३,०२५ नियमित खातेदार शून्य टक्के व्याज सवलतीपासून वंचित झाले आहेत.
या शेतकऱ्यांना आता ८.७५ टक्के व्याज भरावे लागणार असून, ३० जूनपर्यंत कर्ज न भरल्यास व्याजदर ११.७५ टक्के होणार आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अधिकच आर्थिक आव्हानांचा ठरणार आहे.
२०२३ मध्ये जिल्हा बँकेमार्फत ५५,३४२ शेतकऱ्यांना ६४७.३० कोटींचे पीक कर्ज वितरित करण्यात आले. हे वाटप बँकेच्या वार्षिक लक्ष्याच्या १०४% होते. बँकेचे मूळ लक्ष्य ६२० कोटी रुपये होते.
Prahar Teachers Association : आमदार-खासदारांना पेन्शन, मग शिक्षकांना का नाही?
महाविकास आघाडी सरकारने दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदारांची कर्जमाफी व नियमित खातेदारांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान दिले होते. यामुळे सात-बारा कोरे झाल्याने कर्जवाटप वाढले. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही गटांनी कर्जमाफीची आश्वासने दिली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली. परंतु सध्याच्या महायुती सरकारकडून कर्जमाफीबाबत ठोस निर्णय न घेतल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.
Amravati District Administration : ७३ ठिकाणी लोकांना दुषित पाण्याचा पुरवठा!
जिल्हा बँकेप्रमाणेच राष्ट्रीयीकृत बँकांनाही कर्जवसुलीत अडचणी येत आहेत. थकीत कर्जामुळे बँकांचा एनपीए (NPA) वाढत असून, त्यामुळे आर्थिक स्थैर्यावर परिणाम होत आहे. याचा फटका आगामी खरीप हंगामातील कर्जवाटपावर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.