Revenue Minister’s district fails in 100-day campaign : १०० दिवसांच्या कार्यालयीन मोहिमेत अमरावती पिछाडीवर
Amravati मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या संकल्पनेतून राज्यात राबवण्यात आलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अमरावती जिल्ह्याचा शून्य कामगिरीसह पुरता पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच या जिल्ह्याचे पालकत्व असताना अशी अवस्था झाली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून सर्व शासकीय कार्यालयांत पारदर्शकता, नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण, ऑनलाइन व्यवहार, झिरो पेन्डेन्सी यासारख्या गोष्टींवर भर देण्यात आला होता. या मोहिमेचे QCI Quality Council of India मार्फत मूल्यमापन करण्यात आले आणि १ मे रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभागप्रमुख व अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली.
Local Body Elections : निवडणूक जिंकवून देणाराच होणार भाजपचा अध्यक्ष!
या यादीत ५ सचिव, ५ आयुक्त, ५ जिल्हाधिकारी, ५ पोलीस अधीक्षक, ५ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ४ महापालिका आयुक्त, ३ पोलीस आयुक्त आणि २ विभागीय आयुक्त व २ पोलीस परिक्षेत्र प्रमुख यांचा समावेश करण्यात आला. मात्र, अमरावती जिल्ह्यातील एकाही अधिकाऱ्याचे नाव या यादीत नाही, ही बाब खटकणारी आहे.
अमरावतीसाठी वेळोवेळी बैठकांचे आयोजन, विभागीय आयुक्तांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या यंत्रणेला सूचना देऊनही अपेक्षित परिणाम दिसून आले नाहीत. त्यामुळेच आता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे येत्या आठवड्यात अधिकाऱ्यांचा ‘क्लास’ घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
Bacchu Kadu : अजितदादांच्या घरापासून आंदोलन सुरू होणार, फडणविसांच्या घरापुढे सांगता!
विशेष म्हणजे या स्पर्धेत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, जिल्हा परिषद सीईओ, महापालिका आयुक्त आदींचा सहभाग होता. राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासनाच्या ४८ विभागांसाठी धोरणात्मक १०० दिवसांचा कार्यक्रम आखला होता. यामध्ये नव्या योजना, लोकाभिमुख निर्णय व कार्यक्षमतेचे मूल्यांकन या गोष्टी समाविष्ट होत्या. त्यामुळेच अमरावतीचा अपयश हा प्रशासनासाठी तसेच राजकीय नेतृत्वासाठी आत्मचिंतनाचा विषय ठरत आहे.