Breaking

BJP Shivsena : भंडारात ठाकरे गटाला धक्का; उबाठाचे प्रमुख कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

Big blow to Uddhav Thackeray group in Bhandara : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपूर्वी भाजपचे बळ वाढेल

Bhandara शिवसेनेच्या (ठाकरे गट) उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. उबाठा गटाचे तालुकाप्रमुख ललितजी बोंद्रे, शहरप्रमुख अशोक चूटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. भंडाऱ्यात झालेल्या भव्य कार्यक्रमात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये ललित बोंद्रे, अशोक चूटे यांच्यासह राजू दुबे (वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष), टोमदेव तितिरमारे (भंडारा शहर समन्वयक), शैलेश खरोले (विभाग प्रमुख), तसेच गंगाधर निंबार्ते, प्रमोद बोरकर, विकास बागडे, संदीप गमने, प्रकाश गभणे, विजय धकाते, आकाश मनंदूरकर, रवी शेंडे यांचा समावेश आहे. या सर्व कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाचा निरोप घेत भाजपचा भगवा हाती घेतला.

Vidarbha Farmers : आधी पंचनामे करा, मगच राजकारण!

कार्यक्रमात सर्वांचे भाजपा कडून औपचारिक स्वागत करण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नव्या कार्यकर्त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष अधिक जोमाने काम करत असून, विविध पक्षांतील नेते व कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आहेत. आजच्या प्रवेशाने भंडाऱ्यात ठाकरे गटाच्या संघटनात्मक बळाला मोठा धक्का बसला आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या प्रवेश सोहळ्याला भंडारा भाजपचे ज्येष्ठ नेते विजयजी लिचडे, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष सचिन कुंभलकर, जिल्हा परिषदेतील गटनेते विनोदजी बांते, प्रशांत खोब्रागडे, सूर्यकांत इलमे, प्रशांत निंबोलकर, आकाश फाले, उमराव सेलोकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

MNREGA workers : वेतन देता येत नसेल तर भीक द्या’; मनरेगा कामगारांच्या भावनांचा उद्रेक

कार्यक्रमानंतर झालेल्या संवादात भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “हे प्रवेश हे केवळ संख्या वाढवणारे नाहीत, तर विचारांशी निष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांचे योगदान भाजपच्या ताकदीसाठी मोलाचे ठरेल. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भर मोठी ठरणार आहे.” भंडाऱ्यातील हा राजकीय प्रवेश सोहळा जिल्ह्यात भाजपची पकड आणखी बळकट करेल, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे