Breaking

Bachhu Kadu Protest : दगाफटका केला तर.. सरकारला धडा शिकवण्याचा इशारा

movement pushed forward, not backward, Bachchu Kadu :आंदोलन मागे नाही तर पुढे ढकलले, बच्चू कडू यांनी ठणकावले

Amaravati : प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे उपोषण अखेर सातव्या दिवशी सुटले. अर्थात यावेळी त्यांनी हे आंदोलन मागे नाही तर पुढे ढकल्याचे सरकारला बजावले. सोबतच जर दगाफटका केला तर सरकारला धडा शिकवण्याचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.

बच्चू कडू यांचे उपोषण अखेर सातव्या दिवशी सुटले. 8 तारखेपासून त्यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत होता. कालपासून सरकारने हे आंदोलन मागे घ्यावे म्हणून प्रयत्न सुरू केले होते. आज मंत्री उदय सामंत हे आश्वासनाचा खलिता घेऊन मोझरीत दाखल झाले. त्यांनी सरकारची बाजू मांडली. त्यानंतर बच्चू कडू यांनी उपोषण सुटल्याचे जाहीर केले. पण त्याचवेळी हे आंदोलन मागे घेतले नाही तर पुढे ढकल्याचे त्यांनी सरकारला बजावले.

Prahar’s Agitation : बच्चू कडूंसाठी जरांगेंचे आवाहन, मराठ्यांनी कंबर कसली !

 

जर सरकारने दगाफटका केला, विश्वासघात केला तर मंत्रालयात घुसून प्रहार स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. आम्ही सांगू नागपूरला आणि आंदोलन करू मुंबईला. सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा दाखवू असे सूचक इशारा त्यांनी उपोषण सोडताना दिला. अजित दादा म्हणत होते मी कुठं म्हटलं कर्जमाफी होणार पण आज आमचे कार्यकर्ते यांनी आंदोलन केल्यावर आज ते बोलले. फडणवीस यांनी कर्जमाफीवर मौन पाळल होत आता ते कर्जमाफी वर बोलायला लागले.

आपण कर्जमाफी च्या मागणीवर 90 टक्के यश मिळवलं. दिव्यांगच्या 20 मागण्या आपण मान्य करून घेतल्या. मुख्यमंत्री तारीख दयायला तयार नाही. पण मी 2 ऑक्टोबर तारीख दिली. या ऑक्टोबर पर्यत मी संपूर्ण महाराष्ट्र फिरणार आहे. मी 16 तारखेपासून पाणी त्याग आंदोलन करणार होतो. तूर्तास आंदोलन मागे घेऊ. पुन्हा 2 ऑक्टोंबर पासून आंदोलन करू, असे कडू म्हणाले. यावेळी उपोषण करणाऱ्या वृद्ध आजीने बच्चू कडू यांचे उपोषण सोडले. तुम्ही आमचा विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन करू असे कडू मंत्री उदय सामंत यांना म्हणाले. यावेळी उद्याचा चक्का जाम रद्द केल्याची घोषणा त्यांनी केली.

Prahar’s Agitation : बच्चू कडू आता जलत्यागही करणार, आंदोलन होणार तीव्र !

2 ऑक्टोबरपर्यत कर्जमाफीची तारीख सांगावी, नाही तर मंत्रालयात घुसू. मतदान कोणालाही मारा मात्र आंदोलन करण्यासाठी आमच्या सोबत या, असे आवाहन त्यांनी केले. शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्याची गरज नाही. कर्ज वसुलीची सक्ती केली तर बँकवाल्याला गावात झाडाला बांधा असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.

सरकारने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले आहे. काही तांत्रिक बाबींची पुर्तता कराव्या लागतात. सरकारला आम्ही 2 ऑक्टोबरपर्यंत मुदत देतो. जर तोपर्यंत मागण्या मान्य करून त्यावर योग्य ती अंमलबजावणी केली नाही तर आम्ही मंत्रालयात घुसू. तिथे आंदोलन करू असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. त्यांनी सरकारला डेडलाईन दिली आहे. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आहे. त्यादिवशी भगतसिंह यांच्यासारखे आंदोलन करू असा सज्जड दम कडू यांनी दिला आहे.

Bacchu Kadu : बावनकुळेंचे लेखी आश्वासन; बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित!

उदय सामंत यांच्या भेटीनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं. शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील, या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र त्यानंतरही बच्चू कडू आपल्या उपोषणावर ठाम होते? समिती कधी स्थापन करणार हे जाहीर करावं, अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर आज मंत्री सामंत यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. ते या संदर्भातील पत्र घेऊन आले होते.

Prahar’s Agitation : बच्चू कडू ऐकतील, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास !

कर्जमाफीसंदर्भात येत्या 15 दिवसांच्या आता उच्चस्तरिय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आला की कर्जमाफी होईल. बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्या कशा मान्य केल्या जातील याचं पत्र घेऊन मी आलो आहे. मी यासंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. असं यावेळी उदय सामंत यांनी स्पष्ट केले.