Breaking

Anand paranjpe : त्यांची गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळे सात दिवसात बाहेर काढणार

 

Paranjape warns Gogawale, saying Raigad’s ‘idiot’ made a fuss : रायगडच्या ‘इडियट’ने पुन्हा गरळ ओकली म्हणत आनंद परांजपेंचा गोगावलेंना इशारा

Mumbai – रायगड मधल्या ‘थ्री इडियट्स’ पैकी एका ‘इडियट’ने पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्याविरुद्ध गरळ ओकली. त्या ‘इडियट’ ची गुन्हेगारी आणि आर्थिक घोटाळे सात दिवसात बाहेर काढण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिला आहे. पालकमंत्री पदासाठी हपापलेले शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि संवेदनशीलता गेलेली आहे. अशा शब्दात आनंद परांजपे यांनी जोरदार टीका केली आहे.

खा. सुनिल तटकरे यांच्या भाची सुनेचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांचे कुटुंब अद्याप दुःखातून सावरलेले नाहीत. मात्र दुसरीकडे भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदावरून बेछूट आरोप केले. त्यांनी बोलताना सिंचन घोटाळ्याचा विषय काढला. परंतु सिंचन घोटाळ्याची फाइल कुठे अडकली असेल तर ती त्यांनी बाहेर काढावी. असे खुले आव्हान आनंद परांजपे यांनी दिले आहे आहे. गोगावले यांची गुन्हेगार प्रवृत्ती, रायगडमध्ये केलेले आर्थिक घोटाळे सार्वजनिक बांधकाम सभापती असताना जिल्हा परिषदमध्ये केलेले घोटाळे सात दिवसामध्ये बाहेर काढणार असल्याचेही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केले.

Indrayani bridge collapsed : ‘ती’ एक चूक केली नसती, तर पूल कोसळला नसता !

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यावर टीका करणे हा एक कलमी कार्यक्रम या ‘थ्री इडियट’ कडून सुरू आहे असा थेट आरोप करताना परांजपे यांनी, विधानसभेत सुनिल तटकरे यांनी युती धर्माचे पालन केले. तसे नसते तर गोगावले काय अजून दोन उमेदवार पडले असते असेही सांगितले. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर होती. त्यावेळी मतदारसंघात केलेल्या कामाच्या जोरावर तटकरे हे निवडून आले.मात्र हे ‘थ्री इडीयट्स’ बेछूट आरोप करत आहेत असेही परांजपे यावेळी म्हणाले.

The bridge collapsed : मावळात पूल कोसळून दोन ठार, काही वाहून गेले, एनडीआरएफला पाचारण !

ज्या शिवसेनेने तुम्हाला ओळख दिली राजकारणात वर आणले त्यांच्यावर अशा प्रकारे आरोप करणे चुकीचे आहे. मी देखील शिवसेनेत काम केले आहे. रश्मी ठाकरे या कुटुंबवत्सल आहेत. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा कधीच हस्तक्षेप नसायचा असे सांगतानाच जिल्हा परिषद सभापती, आमदार ही ओळख तुम्हाला कुणी दिली? जर शिवसेनेने मोठे केले आणि अशा वेळेस रश्मी वहिनीवर आरोप करत असाल तर ते दुर्दैव आहे अशा शब्दात परांजपे यांनी सुनावले आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा वेगळा राजकीय पक्ष आहे. निवडणुकीसाठी शिबिर घेण्याचा अधिकार त्यांना आहे असे बोलतानाच स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.शिवसेना सोडल्यानंतर पुन्हा जाण्याचा कुठलाच प्रयत्न नव्हता असेही आनंद परांजपे यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

___