Breaking

Amravati Municipal Corporation : मुसळधार पाऊस कोसळला तर अर्धे अमरावती पाण्याखाली जाणार!

The administration’s ability to cope with heavy rains is in doubt : शहरातील २०७ इमारतींनी डिवॉटरिंग यंत्रणा बसवलीच नाही; तळमजल्यातील साहित्याच्या नुकसानाची भीती

Amravati मुसळधार पावसात अमरावती शहरातील ३१२ इमारतींच्या तळमजल्यात दरवर्षी पाणी साचते. मात्र, यापैकी केवळ १०५ इमारतींनीच पाणी काढण्यासाठी डिवॉटरिंग यंत्रणा बसवली आहे. उर्वरित २०७ इमारतींनी ना अग्निशमन विभागाची एनओसी घेतली आहे ना पाणी काढण्याची कोणतीही उपाययोजना केली आहे. त्यामुळे या पावसाळ्यात तळमजल्यातील साहित्य व वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे केवळ ५ डिवॉटरिंग पंप आणि १२४ कर्मचारी (नियमित ३७, कंत्राटी ८७) इतकेच मनुष्यबळ असून, शहराच्या वाढत्या विस्ताराच्या तुलनेत ही व्यवस्था अत्यंत अपुरी आहे. विभागीय अधीक्षक संतोष केंद्रे यांनी माहिती दिली की, शहरातील ३१२ इमारतींना आधीच नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र, बहुतांश इमारतींनी यंत्रणा बसवण्याकडे दुर्लक्ष केले आहे.

Bacchu Kadu : बच्चू कडू यांना ‘सहकार’ने ठरवले अपात्र, हायकोर्टात मिळणार का न्याय?

मुख्य अग्निशमन अधिकारी लक्ष्मण पावडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पावसामुळे नुकसान झाल्यास जबाबदारी संबंधित इमारतीच्या मालक व रहिवाशांची असेल. श्याम चौकातील जेडी जोशी मॉलच्या तळमजल्यात आधीच पाणी साचले असल्याचे उदाहरण यासंदर्भात दिले जात आहे.

शहरात प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नाले, गटारे तुडुंब भरून वाहतात. झाडे कोसळतात आणि इमारतींच्या तळमजल्यात पाणी शिरते. अशा वेळी महापालिकेच्या मर्यादित यंत्रणेमुळे जलद उपाययोजना करणे शक्य होत नाही. त्यामुळे अग्निशमन विभागाकडून शहरात आणखी दोन केंद्रांची आणि किमान ५० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray group : दोन दिवसांत तोडगा निघाला नाही तर कार्यालयाला टाळं ठोकू

महापालिकेने ज्या इमारतींच्या तळमजल्यात दरवर्षी पाणी साचते, त्यांनी स्वतंत्रपणे डिवॉटरिंग यंत्रणा बसवावी, अन्यथा नुकसानाची जबाबदारी स्वतःची असेल, असा पुनरुच्चार केला आहे.