Breaking

Dada bhuse : तिसऱ्या भारतीय भाषेसाठी सक्ती न करता पर्याय दिला !

School Education Minister Dada Bhuse clarified the governments role : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

Mumbai : राज्य सरकारने तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही सक्ती केलेली नाही. पालक व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार भारतीय भाषांमधून एक भाषा निवडण्याचा पर्याय दिला आहे. कोणतीही विशिष्ट तिसरी भाषा शिकण्यासाठी सक्ती केलेली नाही, असे स्पष्टीकरण शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. हिंदी सक्तीचा मुद्द्यावर राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

दादा भुसे यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक आहे. त्याची प्रभावी अनमोलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील ‘ अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट’ मूल्यमापन संकल्पनेचा विचार करून आणि विद्यार्थ्यांचे हित पाहता, राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार भाषिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामध्ये तृतीय भाषा म्हणून कोणतीही एक भाषा बंधनकारक नाही हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक असतील.

Nitin Gadkari : दुचाकीवर टोल टॅक्स? काहीही बातम्या देता राव!

इंग्रजी भाषा ही अनेक वर्षापासून राज्य मंडळाच्या शाळांमध्ये द्वितीय भाषा म्हणून स्वीकृत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी सोबत मराठी आणि हिंदी भाषा शिकवण्यात येतात. राज्य सरकारने तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही सक्ती नाही. पालक व विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार भारतीय भाषांमधून निवड करण्याचा पर्याय दिला आहे. कोणतीही विशिष्ट तिसरी भाषा शिकण्याची शक्ती नाही. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2022 मधील शालेय वेळेच्या नियोजनानुसार प्रथम भाषेत साप्ताहिक दहा तासिका सुचविल्या आहेत.

राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 मधील शालेय वेळेच्या नियोजनानुसार प्रथम भाषेसाठी साप्ताहिक 15 तासिका समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. शालेय तिसऱ्या भाषेसाठी साप्ताहिक फक्त पाच तासिका सुचवल्या आहेत. ज्या भाषेसाठी किमान 20 विद्यार्थ्यांची मागणी असेल त्या भाषेसाठी शिक्षक नियुक्त केले जातील. तसेच 20 पेक्षा कमी विद्यार्थ्यांकरता डिजिटल शिक्षण सुविधा उपलब्ध केली जाईल. पहिली आणि दुसरी मध्ये चित्र गाणी बडबड गीतांद्वारे आनंददायक, मौखिक शिक्षण दिले जाईल. असेही मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यात विविध माध्यमांच्या एकूण 1 लाख 8 हजार 157 शाळा सुरू आहेत. त्यामध्ये 2 कोटी 11 लाख 79 हजार 673 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षकांची संख्या 7 लाख 43 हजार 948 इतकी आहे. यातील मराठी माध्यमांच्या 85 हजार 702 शाळा असून, त्यात एक कोटी 27 लाख 61 हजार 364 विद्यार्थी आणि 45 लाख 58 हजार 100 शिक्षक आहेत.इंग्रजी माध्यमांच्या 15,118 शाळांमध्ये 66 लाख 89 हजार 59 विद्यार्थी आणि 2 लाख 34 हजार 769 शिक्षक आहेत. हिंदी माध्यमाच्या 596 शाळांमध्ये 12 लाख 52 हजार 423 विद्यार्थी आणि 37 लाख 629 शिक्षक आहेत. उर्दू माध्यमाच्या 1600 शाळांमध्ये 4 लाख 2706 विद्यार्थी आणि 13 313 शिक्षक आहेत.

Ration scam : बुलडाण्यात रेशन घोटाळा; नांदुऱ्यात २५० क्विंटल तांदूळ जप्त

गुजराती माध्यमाच्या 322 शाळांमध्ये 33 हजार 230 विद्यार्थी आणि 1366 शिक्षक आहेत. कन्नड माध्यमाच्या 179 शाळांमध्ये 3 हजार 308 विद्यार्थी आणि 1310 शिक्षक. तामिळ माध्यमाच्या 55 शाळांमध्ये 3,997 विद्यार्थी आणि १८८ शिक्षक आहेत. तेलगू माध्यमाच्या 43 शाळांमध्ये 1,799 विद्यार्थी आणि 118 शिक्षक तर सिंधी माध्यमाच्या 8 शाळांमधून 1233 विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षकांची संख्या 33 असल्याची माहिती ही मंत्री दादा भुसे यांनी दिली

राज्यात मराठी माध्यम शाळांमध्ये पाचवीपासून हिंदी शिकवली जाते. हिंदी भाषेतील सध्या उपलब्ध असलेली पुस्तके ही दरवर्षी प्रमाणे आवश्यक असलेली पुस्तके आहेत. हिंदीसह इतर भाषांसाठी नवीन पुस्तक छपाई करण्यात आलेली नाही. राज्य मंडळाच्या मराठी व इंग्रजी माध्यमांच्या व्यतिरिक्त इतर भाषिक शाळांमध्ये मातृभाषा मराठी आणि इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र पूर्वीपासूनच लागू आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे त्रिभाषा सुत्र अनेक राज्यांमध्ये स्वीकारले गेले आहे. त्यानुसार दोन भारतीय भाषा व एक विदेशी म्हणजे इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी शिफारस आहे. मेंदू विज्ञान व बाल मानसशास्त्रानुसार दोन ते आठ वयोगटातील मुलांमध्ये भाषिक कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोच्च क्षमता असते.