Parliament budget session : राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर अमित शाह संतापले, संसदेत मोठा गदारोळ

Amit-shah-criticizes-rahul-gandhi-in-lok-sabha-over-unpublished-book-reference : माजी लष्करप्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ दिल्याने सत्ताधारी आक्रमक

New Delhi आज २ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांच्या एका अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ देत भारत-चीन सीमावादावर भाष्य केले. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीव्र संताप व्यक्त करत राहुल गांधींना खडे बोल सुनावले. “सभागृहाची दिशाभूल करू नका आणि नियमबाह्य वर्तन थांबवा,” अशा शब्दांत अमित शाह यांनी राहुल गांधींना खडसावले, ज्यामुळे लोकसभेत मोठा गदारोळ निर्माण झाला.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात २०१७ च्या डोकलाम वादाचा उल्लेख करताना दावा केला की, जनरल नरवणे यांच्या पुस्तकात चीनने भारतीय पोस्टच्या अत्यंत जवळ आपले टँक आणल्याची माहिती दिली आहे. त्यांनी या पुस्तकातील काही अंश वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने हस्तक्षेप करत नियमांकडे लक्ष वेधले.

Pune land scam : पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल

“ज्या पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन झालेले नाही किंवा जे अद्याप बाजारात आलेले नाही, अशा अप्रकाशित साहित्याचा संदर्भ संसदेत देणे नियमांच्या विरोधात आहे. अशी माहिती आधी अधिकृत स्त्रोताद्वारे सादर केली जावी,” असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींच्या या कृतीवर कडक शब्दांत टीका केली. शाह म्हणाले की, “हे पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही, हे आधी राहुल गांधींनी स्पष्ट करावे. कोणतेही लेख, पोस्ट किंवा अप्रकाशित पुस्तकांचा हवाला देऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात दिशाभूल करणारी माहिती देणे अयोग्य आहे. विनाकारण भाष्य करून सभागृहाचा वेळ वाया घालवू नका.” यावेळी सत्ताधारी बाकांवरून राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राहुल गांधींच्या विधानाचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.

MNS Raj Thackeray vs BJP Tamil Selvan : ‘मुंबईच्या रस्त्यावर १ लाख तमिळ बांधव उतरतील’; भाजप आमदाराचे राज ठाकरेंना खुले आव्हान

सभागृहातील वाढता तणाव पाहून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना नियमांची जाणीव करून दिली. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील मुद्द्यांवर भाष्य करताना सदस्यांनी अधिकृत आणि प्रमाणित माहितीच सादर करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

अनधिकृत माहिती सादर केल्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होते, असेही त्यांनी नमूद केले. या गदारोळामुळे काही काळ सभागृहाचे कामकाज ठप्प झाले होते. राहुल गांधींच्या या दाव्यामुळे आता भारत-चीन सीमावादावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.