NCP Ajit Pawar : पक्षाचा ‘बाहेर’ विस्तार, पण बालेकिल्ल्यातच आव्हान; नाझेर काझींच्या निवडीनंतर राष्ट्रवादीची कसोटी

ncp-ajit-pawar-group-expansion-nazir-kazi-buldhana-challenges : अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून विदर्भात मोर्चेबांधणी; वाशिम-यवतमाळच्या दौऱ्यांनी संघटनात्मक हालचालींना वेग

Buldhana राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये नाझेर काझी यांची अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून पक्षाच्या राजकीय हालचालींना मोठी गती मिळाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आता आगामी निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून आपली विस्कळीत झालेली मतपेढी पुन्हा बांधण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. मात्र, पक्ष विस्तार करत असताना स्वतःच्या जिल्ह्यात निर्माण झालेले आव्हाने पेलणे, हे नव्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

अलीकडेच वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत पक्षाच्या वतीने आढावा बैठकांचे सत्र राबवण्यात आले. या बैठका केवळ औपचारिक नसून, अल्पसंख्याक समाजाला पुन्हा पक्षाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी घेतलेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. विदर्भातील मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक बहुल मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा ‘राष्ट्रवादी’चा दबदबा निर्माण करण्यासाठी नाझेर काझी यांनी आक्रमक धोरण स्वीकारल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

Harshwardhan Sapkal : ही तर ‘हैदराबादी निजाम’ मानसिकता, सपकाळांचा सडकून समाचार

 

 

पक्षाच्या या वाढत्या सक्रियतेमध्ये एक कळीचा मुद्दा समोर येत आहे. यवतमाळ आणि वाशिम सारख्या शेजारच्या जिल्ह्यांमध्ये पक्ष पुनर्बांधणीसाठी मोठी शक्ती खर्च केली जात आहे. अल्पसंख्याक समाजाची मोट बांधण्यासाठी बैठका आणि संपर्क वाढवला जात आहे.

बाहेरील जिल्ह्यांवर भर दिला जात असताना, बुलढाणा जिल्ह्यात मात्र पक्षाची पकड काहीशी ढिली झाल्याचे चित्र आहे. अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात असून, त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे मोठे काम नाझेर काझी यांना करावे लागणार आहे. “बाहेरचा बालेकिल्ला जिंकण्याच्या नादात, स्वतःच्या घरातील बुरूज ढासळू नयेत,” अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Khamgao District demand : ‘खामगाव जिल्हा’ चर्चांना पुन्हा वेग; प्रशासकीय हालचालींमुळे आशा पल्लवित

नाझेर काझी यांच्या निवडीमुळे पक्षात एक नवा चेहरा मिळाला असला, तरी त्यांना बाह्य विस्तार आणि स्थानिक बळकटी यांचा समतोल साधावा लागणार आहे. विदर्भातील अल्पसंख्याक मतांचे विभाजन टाळून ती पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे वळवणे, हे येणाऱ्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. या संघटनात्मक फेरबदलाचे प्रतिबिंब आगामी निवडणुकीच्या निकालात कसे उमटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.