व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vidhan parishad election : विधान परिषदेसाठी शिवसेनेत सस्पेन्स, एक नाव निश्चित, दुसऱ्या...

Vidhan parishad election : विधान परिषदेसाठी शिवसेनेत सस्पेन्स, एक नाव निश्चित, दुसऱ्या उमेदवारीवर अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच

shivsena-vidhan-parishad-election-candidate-suspense-neelam-gorhe-second-seat : इच्छुकांची संख्या वाढल्याने पक्षांतर्गत समीकरण गुंतागुंतीचे, ‘प्रहार’वर अद्याप निर्णय नाहीच

Mumbai : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत उमेदवारीबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला असून अखेरच्या क्षणापर्यंत निर्णय लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आता सर्वांचे लक्ष शिवसेनेकडे लागले आहे. दोन जागांसाठी संधी असताना एक जागेवर नाव जवळपास निश्चित झाले असले तरी दुसऱ्या जागेसाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिवसेनेकडून एका जागेसाठी नीलम गोऱ्हे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र दुसऱ्या जागेसाठी अनेक इच्छुकांनी जोर लावल्यामुळे पक्षांतर्गत समीकरणे गुंतागुंतीची बनली आहेत. या जागेसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचे नाव चर्चेत आले होते. मात्र त्यांनी प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करण्याची अट मांडल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी मुंबईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Legislative Elections : ना जोशी, ना तिवारी; थेट भेंडेवर बाजी; विधानपरिषदेसाठी भाजपचे ‘सहकार’ धोरण!

दरम्यान, शिवसेनेतील इतर इच्छुकांमध्ये दिपक सावंत, संजय मोरे, रवी फाटक, शायना एनसी, रविंद्र धंगेकर आणि शीतल म्हात्रे यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे. अलीकडेच ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी मिळाल्यामुळे पक्षातील इतर नेत्यांमध्येही आशा निर्माण झाली असून त्यामुळे स्पर्धा अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे भाजपने विधान परिषदेसाठी सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांची नावे जाहीर केली आहेत, तर पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटपाचे चित्र मोठ्या प्रमाणात स्पष्ट झाले आहे.

विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीचे वर्चस्व ठळकपणे दिसून येते. भाजपकडे 131, शिवसेनेकडे 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 आमदार असल्याने एकूण संख्याबळाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार सहज विजयी होण्याची शक्यता आहे. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे संख्याबळ मर्यादित असल्याने त्यांचा केवळ एकच उमेदवार निवडून येऊ शकतो.

Parth pawar : अजित दादांच्या मृत्यूशी जोडलेल्या कंपनीच्या विमानाने पार्थ पवारांचा प्रवास !

दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिल 2026 रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून 30 एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 2 मे रोजी अर्जांची छाननी होणार असून 4 मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान 12 मे रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत होणार असून त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणी केली जाणार आहे. 13 मे 2026 पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

एकूणच, शिवसेनेत दुसऱ्या उमेदवारीसाठी सुरू असलेली अंतर्गत चुरस आणि त्यातून निर्माण झालेला सस्पेन्स आगामी काही तासांत संपणार असला, तरी त्याचे राजकीय पडसाद मात्र पुढील काळात उमटण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!