Pakistan attacked 20 cities, India foiled it : सीमेवर तणाव, सतत गोळीबार, सुरक्षेचा प्रश्न बनला गंभीर
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानकडून सीमा नियंत्रण रेषेवर सातत्याने गोळीबार सुरू आहे. त्याशिवाय ड्रोन हल्लेही केले जात आहेत. पण भारताकडून त्यांचे हे हल्ले निष्फळ करण्यात येत आहेत. सततच्या हल्ल्यांमुळे सीमा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीमेवर दिवसागणिक तणाव वाढत चाललेला आहे.
कुरापाती पाकिस्तानने भारतातील २० शहरांना टार्गेट केले होते. भारतीय लष्कराने त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले. ऑपरेशन सिंदूर द्वारे भारताने केलेल्या प्रतिहल्ल्यनंतर पाकिसान हादरला आहे. बिथरलेल्या स्थितीत त्यांच्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानने पाच राज्यांना टार्गेट गेले होते. यामध्ये जम्मू, काश्मीर, गुजरात, पंजाब आणि राजस्थानमधील २० शहरांचा समावेश होता.
Operation Sindoor : देशाला न्याय मिळाला, सैन्याच्या पाठिशी उभे राहा!
पाकिस्तानने २० शहरांतील लोकांच्या वस्त्या, विमानतळ आणि धार्मिक स्थळांवर हल्ले केले, जे भारतीय सैन्याकडू निष्फळ करण्यात आले. अजूनही काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये श्रीनगरमधील विमानतळ, गांदरबल, अवंतीपोरा यांसारख्या काश्मीर खोऱ्यातील वेगवेगळ्या भागांना टार्गेट करण्याचे प्रयत्न केले जात आहे. पण भारतीय सुरक्षा दल सतर्क असून पाकिस्तानचे सर्व हल्ले निष्फळ केले जात आहेत.
लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आता परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आलेले आहेत. भारत – पाकिस्तानध्ये तणाव वाढत असल्यामुळे दिल्लीत बैठकांचे सत्र सतत सुरू आहे. दरम्यान श्रीनगर विमानतळाच्या जवळपास स्फोटांचे आवाज ऐकल्याचे तेथील लोकांनी सांगितले. पण हा स्फोट म्हणजे ड्रोन हल्ला होता आणि तो उधळून लावण्यात आला, असे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.