India’s economy is the best performing economy in the world : अर्थसंकल्पावर डॉ. भागवत कराड यांचा जाहीर जन संवाद कार्यक्रम
Buldhana : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी २०२५-२६ च्या सादर केलेल्या अर्थसंकल्पाची माहीती देण्याकरीता व जनतेशी संवाद साधण्यासाठी आज (२३ फेब्रुवारी) स्थानिक राजे गार्डन बुलढाणा येथे माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी जाहीर जन संवाद कार्यक्रम घेतला.
यावेळी खासदार कराड म्हणाले, आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’कडे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. यामुळे देशातील नागरिक हे देशाच्या विकासाचे भागीदार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सर्वच क्षेत्रात क्रांती करत आहे. विकासाच्या आकड्यांच्या बाबतीत भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारी अर्थव्यवस्था आहे. अर्थसंकल्पात विशेषत: महिला, शेतकरी, गरीब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न झाला आहे.
१४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची खासदार कराड यांनी उत्तरे दिली. या जनसंवाद कार्यक्रम निमित्ताने अर्थसंकल्पाचा सविस्तर उहापोह करून सामान्य भाषेत अर्थसंकल्पाची माहिती सादर केली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांनी केले. भाजपा लोकसभा प्रमुख आमदार विजयराज शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधित केले.
Sudhir Mungantiwar : बल्लारपूरमध्ये होणार राज्यातील उत्कृष्ट न्यायालयीन इमारत
व्यापीठावर खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, भाजपा प्रदेश सचिव शालिनी बुंधे, भाजपा लोकसभा समन्वयक मोहन शर्मा, जिल्हा सरचिटणीस गजानन घुले, देवीदासजी पाटील, भाजपा ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष विश्वनाथ माळी, भाजपा नेते ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, रावसाहेब देशपांडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष यश संचेती, भाजयुमो जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत होते. कार्यक्रमाचे रसंचालन भाजपा जिल्हा सचिव चंद्रकांत बरदे यांनी केले. आभार जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी यांनी मानले.