The government will solve the problems of police families : गृह राज्यमंत्र्यांनी पोलीस कुटुंबीयांसोबत साधला संवाद
Amravati पोलीस कुटुंबीयांशी संवाद कार्यक्रमात मांडलेल्या समस्यांचे लेखी स्वरूपात संकलन केले जाईल. त्या समस्या सोडविण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
पोलीस मुख्यालयात डॉ. भोयर यांनी पोलीस कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सागर पाटील, कल्पना बारवरकर आदी उपस्थित होते.
डॉ. भोयर म्हणाले, ‘पोलीस कुटुंबीयांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हा संवाद कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यातून अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे आले आहेत. विशेषतः पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न गंभीर आहे. मागील दहा वर्षांत शासनाच्या प्रयत्नाने मोठ्या प्रमाणात पोलीस वसाहती उभारण्यात आल्या आहेत. राज्यस्तरावर या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी समिती कार्यरत आहे.’
‘जिल्ह्यात अनेक पोलीस ठाणे आणि निवासस्थाने स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. त्यांच्यासाठी आवश्यक सुधारणा आणि तरतुदी करण्यात येतील. पोलीस कुटुंबीय दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असतात. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जाईल. या संवादातून आलेल्या सर्व समस्या पोलीस प्रशासनाकडून लेखी स्वरूपात मागवून त्यावर त्वरित कार्यवाही केली जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.
A tigress is looking for a cub : गावांच्या वेशीवर ऐकू येते वाघीणीची डरकाळी
पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी सांगितले की, ‘पोलिसांच्या निवास समस्येवर उपाय म्हणून नव्या गृहसंकुलांचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच पोलीस कुटुंबीयांशी सातत्याने संवाद साधल्यामुळे अनेक समस्या सुटत आहेत, असे त्यांनी नमूद केले.’ कार्यक्रमात श्रीमती कल्पना बारवरकर यांनी प्रास्ताविक केले, तर विशाल आनंद यांनी आभार मानले.