Nagpur BJP plans more than 200 public meetings : मोदी सरकारच्या अकरा वर्षांचे सेलिब्रेशन; नागपूर भाजपचा मास्टर प्लान
Nagpur २०० जनसंवाद सभा, २० संकल्पसभा, चित्रप्रदर्शने, संवाद मेळावे, चौपाळ संवाद, शिबिरे, आयटी स्पर्धा, सोशल मीडिया चर्चा आणि २१ जूनला सुरेश भट सभागृहात विशेष संवाद, असे जबरदस्त सेलिब्रेशन नागपूर भाजपच्या वतीने होणार आहे. मोदी सरकारने ११ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याबद्दल या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत ‘घर चलो’ उपक्रमाद्वारे नागपूरकरांच्या घरोघरी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवली जाणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, संदीप जाधव, बाल्या बोरकर आदींची उपस्थिती होती.
Vatsavitri Pournima : भांडकुदळ बायको नकोच; पुरुषांच्या पिंपळाला उलट्या फेऱ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात २०१४ ते २०२५ या अकरा वर्षांच्या कार्यकाळाच्या पूर्ततेनिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे नागपुरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. या ‘विकसित भारताचा अमृतकाल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कालखंडाचा गौरव या माध्यमातून करण्यात येईल, असे तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.
Maharashtra Navnirman Sena : मनसेचा ‘घंटानाद’, सिंचन विहीर योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप
मागील ११ वर्षांत भारताने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या क्षेत्रांत प्रगती केली आहे. या ११ वर्षांत २६ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या वर आले. घरकुल, वीज, पाणी, शौचालय आणि अन्नसुरक्षा अशा मूलभूत गरजा पूर्ण झाल्या. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नागपुरात कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.
भाजपकडून आयटी सेल स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. याअंतर्गत केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या प्रगतीवर आधारित डिजिटल मीडिया स्पर्धा होईल. तसेच सहाही विधानसभा क्षेत्रांत केंद्र सरकारच्या कामगिरीचे दृश्य प्रदर्शन आयोजित करण्यात येईल. २० मंडळांमध्ये शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येतील, असे तिवारी यांनी स्पष्ट केले