Appeal to BJP workers to strengthen the organization : कार्यकर्त्यांना दिला जनसेवेचा मंत्र; संघटन बळकट करण्याचे आवाहन
Akola भारतीय जनता पक्षाला २०२९ मध्ये ‘शत-प्रतिशत’ यश मिळवून देण्यासाठी संघटनेच्या बळावर व जनतेच्या आशीर्वादाने कामाला लागा. त्याचवेळी आपल्याला पक्षानं मोठं केलय हे आवर्जून लक्षात ठेवा, असे आवाहन भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. ते स्थानिक सिटी स्पोर्ट्स येथे ‘संघटन पर्व – गाव व वस्ती संपर्क अभियान’ अंतर्गत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते.
बैठकीत मंचावर ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आदिवासी विकास मंत्री नामदार अशोक उईके, भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रवींद्र चव्हाण म्हणाले, “पक्षामुळेच आपण मोठे झालो आहोत. भारतीय जनता पक्ष हा दीड कोटी सभासद आणि दीड लाख सक्रिय कार्यकर्त्यांचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. आता तीन कोटी सभासदांच्या लक्ष्याने पुढे जावे. १५ मे पर्यंत समित्यांचे गठन पूर्ण करावे व प्रत्येक कार्यकर्त्याने छातीवर कमळाचा बिल्ला अभिमानाने लावून कार्य करावे.”
ते पुढे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक चांगली कामे सुरू आहेत. त्यांचा सकारात्मक प्रचार करा. सरकार आणि जनतेमध्ये दुवा बनून पक्ष कार्यकर्त्यांनी कार्य करावे. आगामी काळात पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी कामाला लागा.”
Illegal sand smuggling : भंडाऱ्यात वाळू तस्करांचा हैदोस, अधिकार्यांवर हल्ला!
बैठकीत जिल्हाध्यक्षांनी संघटनात्मक कामाचा आढावा सादर केला. आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या भाषणात विदर्भ व पश्चिम विदर्भातील कार्यकर्त्यांच्या एकतेचा गौरव केला आणि आगामी काळात भाजपाचा बालेकिल्ला अधिक भक्कम करण्याचा विश्वास व्यक्त केला.