Breaking

Terrorist attack in Pahalgam : दहशतवादाला ठेचून काढा; लोक उतरले रस्त्यावर!

NCP Ajit Pawar group’s protest march : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे गोंदियात निषेध मोर्चा

Gondia जम्मू-कश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा गोंदियात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. देशभरातून या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) गोंदिया जिल्ह्याच्यावतीने एक भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. रेलटोली येथील राका भवनपासून सुरू झालेला हा मोर्चा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यंत गेला. या मोर्चादरम्यान दहशतवाद्यांच्या या कृत्याचा निषेध करत, मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Devendra Fadanvis : आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था, सायंकाळपर्यंत १८३ पर्यटक मुंबईत येणार !

मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले की, “दहशतवाद हे देशाच्या एकतेसाठी घातक आहे. सरकारने याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे.” तसेच, या घटनेने देशवासीयांच्या मनात संतापाची भावना निर्माण केली असून अशा हल्ल्यांचा चिरडून नाश केला पाहिजे, अशी जोरदार मागणी त्यांनी केली.

मोर्चात माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल यांनी देखील हल्ल्याचा निषेध करत सरकारने प्रभावी पावले उचलावीत, असे मत व्यक्त केले. यावेळी रेलटोली येथील राष्ट्रवादी भवनात दोन मिनिटांचे मौन पाळून मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Chandrashekhar Bawankule : बदललेल्या सकारात्मक वातावरणाला गालबोट लावले !

 

गोंदियातील या मोर्चामार्फत जनतेत एकजूट, शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी “दहशतवादाचा नायनाट करा”, “शांततेला बाधा ठेऊ नका”, “निष्पापांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही” अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून टाकला.