Vijay Wadettiwar said where has the world gone and this is behind the grave : मतांची पोळी खाता येईल, हा उद्देश असावा
Nagpur : औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू झालेले राजकारण थांबता थांबत नाहीये. सर्वजण कामधंदे सोडून कबरीच्या मागे लागले आहेत. असेच करायचे असेल तर सर्व ऐतिहासीक स्थळे पाडून टाका. कबर खोदल्यावर पुन्हा धर्मा – धर्मांत तेढ निर्माण होईल, भांडणे होतील आणि मतांची पोळी खाता येईल, असा कदाचित त्यांचा उद्देश असेल, असे म्हणत काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
योगी आदित्यनाथ यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालायचं की दिल्लीच्या दिशेने पावलं टाकयची हे स्वतः देवेंद्र फडणवीस ठरवतील. सनातन म्हणवतात पण भाजप सत्तेत आल्यापासून सगळ्यात जास्त गोमास एक्सपोर्ट होत आहे. यामध्ये किती वाढ झाली, याचे उत्तर आम्ही मागिलते तर त्यांना दुःख होईल. फालतुचे आरोप केल्यापेक्षा कारवाई केली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बाबतीत वडेट्टीवार म्हणाले की, गेल्या ११ वर्षांपासून गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे. त्यांना कुणी अडवलं? चौकशी करावी, पुरावे असतील तर कारवाई करावी. देशाच्या विरोधात कुणीही कारवाया करत असेल, तर अशांना समर्थन देण्याचे कुठलेही कारण नाही. सत्ता आहे तर त्याचा उपयोग केला पाहिजे. देशाच्या विरोधातील शक्तींना शोधून काढले पाहिजे.
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली ‘आवाकाडो’ची लागवड !
आमचे नेते राहुल गांधींनी ईव्हीएमबाबत भूमिका मांडली आहे. इतरही मोठमोठ्या लोकांनी याबाबत भूमिका मांडलेली आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा होऊ शकतो. तर निवडणूक आयोगाने त्याचे उत्तर दिले पाहिजे. अमेरीकेच्या गुप्तचर यंत्रणेनेही याबाबत आपले म्हणणे मांडले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.