Breaking

patole vs Fadnavis : फडणवीसांनी निवडणूक आयोगाची वकिली करू नये : पटोले

Election Commission should clarify, Fadnavis should not talk about ‘Bharat Jodo’:Congress निवडणूक आयोगाने खुलासा करावा, फडणविसांनी ‘भारत जोडो’वर बोलू नये काँग्रेसने ठणकावले

Mumbai: भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या संगनमताने विधानसभा निवडणुकीत गडबड घोटाळा केला आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रार केली आहे. निवडणूक आयोग समाधानकारक उत्तरे देत नाही. सर्व प्रश्नांची मुद्देसुद उत्तरे ही आयोगानेच दिली पाहिजेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाची वकिली करू नये, तसेच त्यांनी ‘भारत जोडो’वर बोलू नये असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले आहे.

बोगस मतदार याद्या बनवूण, मतांची चोरी करून भाजपा सत्तेत आली आहे. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेच काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह हा घोटाळा कसा केला गेला याची मांडणी केली आहे पण निवडणूक आयोग समाधानकारक उत्तरे देत नाही. सर्व प्रश्नांची मुद्देसुद उत्तरे ही आयोगानेच दिली पाहिजेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाची वकिली करू नये, असे पटोले यांनी म्हणले आहे.

NCP Politics : आमदार मिटकरी म्हणाले, आता पांडुरंगाची ईच्छा..!

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लेखाला उत्तर देत पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीने देशात चुकीचा पायंडा पाडला आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेवरच संशय व्यक्त होत असेल तर लोकशाही व्यवस्थेसाठी ते अत्यंत गंभीर व धोकादायक आहे. २०१४ पासून देशातील सर्व स्वायत्त संस्था भाजपा सरकारने कठपुतली बाहुल्या बनवल्या आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी या संस्थांचा स्वायत्तपणा टिकला पाहिजे यासाठीच राहुल गांधी प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत.

लोकशाही शासन व्यवस्थेत सरकार व संस्थांना प्रश्न विचारणे हा संविधानाने दिलेला हक्क आहे. विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नावर आयोगाने उत्तरे दिली पाहिजेत, भाजपा व फडणवीस यांच्या उत्तरांना काँग्रेस भीक घालत नाही. फडणवीस काय आयोगाचे वकील आहेत का, त्यांनी ही वकिली बंद करावी, असे नाना पटोले म्हणाले.

Prahar Jan Shakti Party : प्रहारचे सरकारला ‘कडू’ सवाल, ‘व्यंगचित्र’ बनले आवाज !

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, आरोप केले नाहीत, त्याची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे गरजेचे आहेत असे असताना भाजपा व देवेंद्र फडणवीस मुद्द्यापासून लक्ष दुसरीकडे वळवत राहुल गांधी व भारत जोडो यात्रेला बदनाम करण्याचे काम करत आहेत. काँग्रेस पक्षाची भूमिका भारत जोडोची आहे पण भाजपा व फडणवीस यांची विचारसरणी “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है”, अशी विभाजनकारी भारत तोडोची आहे, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.