Breaking

Chandrashekhar Bawankule : चार तासांचा जनता दरबार; ७०० च्या वर निवेदने!

Problems raised by the public in the Guardian Minister’s Janata Darbar : समस्या तात्काळ निकाली काढण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Amravati पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी 700 हून अधिक निवेदने सादर केली. चार तास चाललेल्या या जनता दरबारात नागरिकांनी सर्व प्रकारच्या समस्या पालकमंत्र्यांपुढे मांडल्या. विशेषतः पाणी, वीज आणि शेतीच्या संदर्भातील अडचणींची संख्या जास्त होती.

पालकमंत्र्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. नियोजन भवन येथे हे आयोजन करण्यात आले. वीज बिल, मालकी पट्टे, रस्ते, नोकरी, कृषी, शेतकरी आत्महत्या, घरकुल, पाणी आणि क्रीडा क्षेत्रातील प्रश्नांवर चार तास चर्चा झाली. आठ दिवसांत तक्रारींवर निर्णय होईल आणि पालकमंत्री कार्यालयातून यासंबंधीची माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले.

Harshawardhan Sapkal : काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु

मुख्यमंत्री CM Devendra Fadnavis यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे www.sdoamravati.com हे संकेतस्थळ पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र आदी उपस्थित होते.

या संकेतस्थळावर अमरावती उपविभागाचा इतिहास, गावांचे नकाशे, प्रशासकीय अधिकारी आणि त्यांचे कार्यक्षेत्र याची माहिती आहे. तसेच रोजगार हमी योजना, अन्न व नागरी पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार योजना यांसारख्या योजनांची माहिती, अर्ज नमुने आणि शासन निर्णयही उपलब्ध आहेत. QR कोडच्या माध्यमातून नागरिकांना सोपे प्रवेश मिळेल. राज्यातील हे दुसरे उपविभागीय कार्यालय संकेतस्थळ असून, लवकरच राज्यभर ही योजना राबवली जाणार आहे.

अमरावती जिल्हा लवकरच क्षयरोगमुक्त करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री बावनकुळे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ‘रौप्य महोत्सव गौरव सोहळ्या’त त्यांनी टीबीमुक्त ग्रामपंचायत उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी विविध ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले.

Atul Londhe : प्रशांत कोरटकरसोबत फडणविसांच्या कार्यालयातील प्रतिक पडवेकर होता का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Modi यांनी ‘टीबीमुक्त भारत’ संकल्पना मांडली असून, त्यानुसार अमरावतीत व्यापक उपाययोजना सुरू आहेत. यामध्ये आरोग्य विभाग, ग्रामपंचायती आणि स्थानिक प्रशासनाचा महत्त्वाचा सहभाग आहे. जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले.