Breaking

Collector of Akola : शेतकऱ्यांनी केली आदेशांची होळी!

The insurance company has not paid the farmers’ claim : जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश विमा कंपनीकडून डब्ब्यात

Akola खरीप हंगामातील पीक नुकसानीचा विमा परतावा एका महिन्यात वितरित करावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र, सव्वा महिना उलटूनही विमा कंपनीने अद्याप परतावा दिलेला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची होळी करून विमा कंपनीच्या कार्यशैलीचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच कर्जमाफीच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर केले.

यावेळी विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अकोल्यात मात्र बळीराजा आपल्या हक्काच्या विमा परताव्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसून आले. शेतकरीपुत्रांच्या भावना दुखावणारी ही घटना ३० जानेवारी रोजी झालेल्या बैठकीशी संबंधित आहे.

Chandrashekhar Bawankule : पश्चिम विदर्भाची हवाई connectivity वाढणार!

या बैठकीत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विमा कंपनीला एका महिन्यात पीक विम्याचा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश दिला होता. मात्र, विमा कंपनीने या आदेशाची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना थेट दुजोराही दिला नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदेशाची होळी केली आणि निषेध व्यक्त केला.

शेतकरीपुत्र गोपाल पोहरे म्हणाले, “विमा कंपनीने आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. आम्हाला आमच्या हक्काचा परतावा मिळायलाच हवा.” प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ४,३३,६६८ शेतकऱ्यांनी (३,५८,९९६.११ हेक्टर क्षेत्रफळ) सहभाग घेतला होता. मात्र, सातत्याने झालेल्या अतिवृष्टीमुळे २,९८,१९२ शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

विमा कंपनीने पंचनामे करूनही शेतकऱ्यांना नुकसानीचा २५ टक्के परतावाही दिलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत तातडीने परतावा मिळण्याची मागणी केली. ३० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कुंभार यांनी पीक विम्याचा २५ टक्के अग्रिम परतावा एका महिन्यात वितरित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, सव्वा महिना उलटूनही हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही.

Prepaid Meter : प्रीपेड वीज मीटरविरोधात जनआक्रोश

यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, लवकरात लवकर परतावा न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनात गोपाल पोहरे, देवानंद साबळे, संदीप मेटांगे, पंकज बाजोड, कुशल जैन, देवा गावंडे, कोगदे, रवी गावंडे, विष्णू अरबट, सुनील लांडे, चेतन नराजे आदी युवा शेतकरी सहभागी झाले होते.