Breaking

Ganesh Naik : पक्ष वाढवण्याचा अधिकार कुणी रोखू शकत नाही !

 

No one can stop the right to expand the party : वनक्षेत्राच्या बाहेर जाऊन भोसलेचे घर पाडले असेल, तर कारवाई करणार

Nagpur : महायुतीमध्ये प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तो कुणीही रोखलेला नाही. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी, आमदारांनी कुठल्याही क्षेत्रात जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार केला आणि त्याद्वारे महायुती मजबूत करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे स्वागत आहे, असे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले.

वनमंत्री नाईक काल (९ एप्रिल) नागपुरात बैठकीसाठी आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 65 टक्के वन विदर्भात आहेत आणि वनविभागाची बहुतांशी कार्यालये नागपुरात आहे. त्यामुळे वनविभागाच्या महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन नागपूर करण्यात आले आहे. मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी काम करायचे आहे. वन विभागाचे उत्पन्न वाढावे, यासाठी वन विकास महामंडळ आणि सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राचे वनक्षेत्र 21 टक्क्यांवरून 30 टक्के व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Amar Kale, Amit Shah : काय सांगता? वर्धेत दारूबंदी आहे?

खोक्या भोसलेच्या घरासंदर्भात विचारले असता, वन अधिकाऱ्यांनी खोक्या भोसलेच्या कुटुंबीयांचे घर वनक्षेत्राच्या बाहेर असताना पाडले असेल, तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. मात्र वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून ते राहत असतील, तर वन विभागाची कारवाई योग्यच म्हणावी लागेल. वनक्षेत्राच्या बाहेर जाऊन वनाधिकाऱ्यांनी घर पाडले असेल, तर चौकशीअंती अधिकाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असं ते म्हणाले.

Devendra Fadnavis, Anil Ambani, Uday Samant : यवतमाळ विमानतळ रिलायन्सकडून काढून घेतले!

राज्यमंत्र्यांच्या अधिकाराबाबत मंत्री नाईक म्हणाले की, 1995 मध्ये युती झाली होती. तेव्हापासूनच मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यातील कामांचे वाटप केले होते. त्यानुसारच राज्यमंत्र्यांना अधिकार दिले जातील, असा विश्वास आहे. सातारा जिल्ह्यात जल प्रकल्पाचे काम कुणीही थांबवलेलं नाही. कोणताही प्रकल्प सुरू करताना पर्यावरण विभाग आणि वनविभागाची औपचारिक परवानगी आवश्यक असते. त्या अनुषंगाने दोन्ही खात्यांत कागदपत्रांचे आदानप्रदान होईल. कोणताही प्रकल्प अडवण्याचे काहीच कारण नाही, कोणीही अडवणार नाही. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी राज्यात कुठल्याही भागात जनतेसाठी प्रकल्प करण्याचा ठरवलं, तर महायुतीचे सर्व नेते त्या प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील.