Breaking

Harshawardhan Sapkal : आधी चक्की पिसींग-पिसींग अन् आता गळ्यात गळे घालींग-घालींग !

Congress makes serious allegations against BJP and Devendra Fadnavis : भाजपने मिरची गोड करून घेतली, आता कुत्र्यांशी सोयरीक जोडली

Mumbai : भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिक्की प्रकरणातून दोषींना क्लिन चिट देण्याचे प्रशिक्षण घेतले. सुरूवातीला ते आपल्याच पक्षातील दोषींना क्लिन चीट देत होते. आता मात्र जवळपास सर्वच पक्षांतील दोषी लोकांना क्लिन चीट देण्याचा सरावच त्यांना झालेला आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर तोफ डागली.

मुंबईत आज (ता. १८ जून) आयोजित पत्रकार परिषदेत सपकाळांनी फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, आधी भाजपने मिरची गोड करून घेतली. म्हणजे इकबाल मिरचीला सोबत घेतले. आता कुत्र्याशी सोयरीक केली आहे. म्हणजेच दाऊदचा हस्तक सलीम कुत्ताही त्यांना चालतो, हे त्यांनी सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेऊन सिद्ध केले. काही लोकांबाबत फडणवीस बोलत होते की, ‘चक्की पिसींग-पिसींग, अन् आता ते त्यांच्याच ‘गळ्यात गळे घालींग-घालींग..’ करत आहेत.

Vijay Wadettiwar : वडेट्टीवारही कडाडले; म्हणाले, महायुतीने आपली नियत दाखवली !

उद्धव ठाकरे जेव्हा भाजपपासून वेगळे झाले, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेससोबत सोयरीक करणार का, असा प्रश्न फडणवीसांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. तेव्हा ‘एक वेळ अविवाहित राहीन, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार नाही. नाही.. नाही.. नाही…’, असे उत्तर द्यांनी दिले होते. पण नंतर त्यांनी तेच केलं. यांच्या राजकारणाला काय म्हणावं? पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवारांवर गंभीर आरोप करतात अन् तेच अजित पवार नंतर मंत्रिमंडळात दिसतात. राणेंच्याही बाबतीत तेच घडलं. त्यामुळे भाजपच्या या नितीची आता सर्वांनाच विरक्ती आली आहे, असे सपकाळ म्हणाले.

Helicopter crash in Kedarnath : वणीच्या जायसवाल कुंटुंबातील तिघांवर अंत्यसंस्कार

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी झालेले सुधाकर बडगुजरांच्या माध्यमातून दाऊदपर्यंत कारपेट टाकले जात आहे. याच बडगुजरांबद्दल फडणवीसांनी सभागृहात सांगितले होते की, ‘गंभीर आहे, एसायटी लाऊ..’ एकनाथ शिंदे म्हणत होते की, ‘सलीम कुत्ताबद्दल बोलणे म्हणजे कुत्र्याचाही अपमान आहे..’ पण त्याच्यासोबत संबंध असलेल्या बडगुजरांना भाजपने शेवटी पक्षात घेतलेच. आता फक्त दाऊद इब्राहीम केव्हा भाजपमध्ये येतो, याची प्रतीक्षा आहे, असे म्हणत सपकाळांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावला.