Breaking

Harshawardhan Sapkal : निर्लज्जपणे कसे सांगता रे..?

Congress state president Harshvardhan Sapkal attacks Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar : तेव्हा तर कर्जमाफी आणि लाडक्या बहीणींना २१०० रुपये देणार म्हणून मते घेतली ना…

Mumbai : अवकाळी पावसाने शेतकरी संकटात, त्यात शेतमालाला भाव नाही, जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले आहे. अशात वचन दिलेले असतानाही सरकार कर्जमाफी देत नाही. निवडणुकीच्या वेळी कर्जमाफी आणि लाडक्या बहीणींना २१०० रुपये देऊ, असे वचन देऊन मते घेतली आणि ‘आम्ही तसे बोललोच नाही..’, असे आता निर्लज्जपणे कसे सांगतात हे, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

ताबडतोब शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहीणींना २१०० रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा. पुण्यात अजित पवारांच्या कार्यक्रमात संतप्त शेतकऱ्यांनी जाब विचारला असता अजित पवारांनी त्यांना दमदाटी केली. अजित दादांची ही दादागिरी चालणाj नाही. तुम्ही जनतेचे सेवक आहात, मालक नाही, याचे भान ठेवा. कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा करता, आश्वासन देताना नाही आठवली का समिती? राज्याची परिस्थिती दिसली नाही? शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, तर अदानी – अंबाणीना लाखो – करोडो रुपयांचा लाभ देण्यासाठी पैसा येतो कुठून? शेतकऱ्यांना, लाडक्या बहीणींना पैसे द्यायचे म्हटले की तिजोरीची आठवण येते का, अशा प्रश्नांची सरबत्ती सपकाळ यांनी केली.

Vijay Wadettiwar : शरद पवारांच्या बोलण्याचे दोन-तीन अर्थ असतात, त्यामुळे…

राज्य सरकारची तिजोरी रिकामी असेल तर दिल्लीत जाऊन मोदी – शाह यांच्याकडून राज्यासाठी पैसा आणा. तेवढी तरी हिंमत दाखवा. समितीचा खेळ करू नका आणि तातडीने शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहीणींना २१०० रुपये द्या. शेतकरी आणि बहीणींच्या संयमाचा अंत बघू नका. अन्यथा ते तुम्हाला चांगलेच महागात पडेल, असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

Local Body Elections : दिलीप सानंदा राष्ट्रवादीत; समर्थक भाजपमध्ये!

भाजप – महायुती सरकार अदानी – अंबाणीसाठी पायघड्या घातले. पण शेतकरी व बहीणींना पेसे देताना टाईमपास करत आहे. सुरजागडच्या खाणीतून मलाई खाणार, समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार, घोडबंदर भाईंदर बोगदा प्रकरणात भ्रष्टाचार, पुणे रिंग रोड आणि अदानीच्या शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्याचा उद्योग देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे करत असल्याचा घणाघाती आरोपही सपकाळ यांनी केला.